शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

कारखानदारांना भंगारवाल्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 03:23 IST

कचरा आणि वापरण्यात येणाऱ्या लोखंडी, प्लास्टिक, काच आदी वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी भंगार व्यावसायिकांचा आधार घेत आहेत.

सिकंदर अनवारे,

दासगाव- महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदार घातक टाकाऊ रासायनिक कचरा आणि वापरण्यात येणाऱ्या लोखंडी, प्लास्टिक, काच आदी वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी भंगार व्यावसायिकांचा आधार घेत आहेत. यामुळे भंगाराच्या अड्ड्यांवर कारखान्यांत वापरल्या जाणाऱ्या या वस्तू आणि रसायन सापडत आहेत. येथेच ही घातक रसायने जमिनीमध्ये जिरवली जात आहेत. रहिवासी वस्ती आणि शेतजमिनीशेजारी असणाऱ्या या भंगाराच्या अड्ड्यांमुळे ग्रामीण भागात धोकादायक वातावरण निर्माण झाले आहे. हाकेच्या अंतरावर प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. मात्र तक्र ार केल्याशिवाय येथील अधिकाऱ्यांना काहीच समजत नसल्याने हे कार्यालय आणि येथील अधिकारी असून नसल्यासारखेच आहेत. यामुळे कारखानदार आणि भंगार व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे.महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदार प्रदूषण कमी झाल्याचे छाती फुगवून सांगत आहेत. तसे पाहिले तर काही अंशी ते खरे देखील आहे. मात्र हे प्रदूषण कमी करण्यासाठी कारखानदारांनी भंगार व्यावसायिकांना हाताशी धरल्याचे समोर येत आहे. कारखान्यांचा हा कचरा आता भंगारवाल्यांच्या अड्ड्यावर दिसून येत आहे. कारखान्यांमध्ये हाऊस किपिंगचा ठेका काढला जातो. सर्वसामान्यांसाठी याचा अर्थ अंतर्गत साफसफाई असा असला तरी कारखानदारांच्या भाषेत हा भंगारचा ठेका असतो. यामध्ये कारखान्यातील टाकाऊ कागद, प्लास्टिक, लोखंडी सामानापासून ते वापरास अयोग्य सर्वच वस्तू या भंगार व्यावसायिकांच्या माथी मारल्या जातात. धंदा पाहिजे म्हणून हे भंगार व्यावसायिक कारखान्यांतून बाहेर टाकण्यात येणाऱ्या सर्वच वस्तू घेतात. यामुळे औद्योगिक वसाहत परिसरातील या भंगाराच्या अड्ड्यांवर अ‍ॅसिड, रसायनांचे छोटे मोठे कंटेनर, काचेच्या बाटल्या, रसायन वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी पाइपलाइन, प्रयोगशाळेतील सामान आदी साहित्य सापडते. या सामानाकडे भंगार म्हणून दुर्लक्ष केले तरी २०० लिटर ते एक हजार लिटरपर्यंतच्या केमिकलने भरलेल्या टाक्या देखील या भंगार अड्ड्यावर सापडतात. बिरवाडी टाकी कोंड, बिरवाडी कुंभार वाडा, देशमुख कांबळे, औद्योगिक वसाहतीतील रहिवासी झोन, मुंबई- गोवा महामार्गावर राजेवाडी गाव, इसाने कांबळे गाव हद्दीत अशा ठिकाणी हे भंगार अड्डे चालविले जात आहेत.महाड औद्योगिक वसाहत क्षेत्रालगत असलेल्या इसाने कांबळे गावहद्दीत आणि म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर मोठा भंगार अड्डा चालवला जात आहे. मूळच्या शेतजमिनीमध्ये मातीचा भराव टाकून हा अड्डा तयार करण्यात आला आहे. गतवर्षीच्या भंगार अड्ड्यावरील वायुगळती आणि चार कामगारांच्या मृत्यूनंतर महाड औद्योगिक वसाहतीतील जो भंगार अड्डा बंद के ला, तोच हा अड्डा आहे. या ठिकाणी राजरोसपणे केमिकल आणि भंगार उतरविले जात आहे.>दुर्घटना घडण्याची शक्यताकारखान्यांतील कामगार हा संबंधित केमिकल हाताळण्यासाठी प्रशिक्षित असतो. त्याला त्यासाठी आवश्यक सुरक्षा साधने पुरवलेली असतात. मात्र तसे कोणतेही प्रशिक्षण अगर सुरक्षा साधन भंगार व्यवसायावरील कामगारांना नसते. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अपघात या कामगारांच्या अगर शेजाऱ्यांच्या जिवावरही बेतू शकतो.गतवर्षीच्या दुर्घटनेचा विसरमहाड औद्योगिक वसाहतीतील एक्झोनेबल कारखान्याच्या समोरील एका बंद कारखान्याच्या जागी भंगार व्यवसाय सुरू होता. गतवर्षी या भंगाराच्या अड्ड्यावर वायुगळती झाली होती. यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला होता. भंगाराच्या अड्ड्यावर रसायन हाताळण्याचा संबंध काय? हा प्रश्न तेव्हा उपस्थित करण्यात आला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाड औद्योगिक वसाहत प्रशासनाने परिसरातील सर्वच भंगार व्यावसायिकांना नोटिसा बजावून जागा खाली करण्याचे आदेश दिले होते. गतवर्षी झालेल्या या वायुगळतीचा सर्वांनाच विसर पडला आहे.>भंगार व्यवसाय हा आमच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे त्यावर थेट कारवाई आम्ही कधीही केलेली नाही. जर भंगार व्यवसायाच्या माध्यमातून प्रदूषण होत असेल तर कारवाई केली जाईल. -सागर औटी, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड