शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

कारखानदारांना भंगारवाल्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 03:23 IST

कचरा आणि वापरण्यात येणाऱ्या लोखंडी, प्लास्टिक, काच आदी वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी भंगार व्यावसायिकांचा आधार घेत आहेत.

सिकंदर अनवारे,

दासगाव- महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदार घातक टाकाऊ रासायनिक कचरा आणि वापरण्यात येणाऱ्या लोखंडी, प्लास्टिक, काच आदी वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी भंगार व्यावसायिकांचा आधार घेत आहेत. यामुळे भंगाराच्या अड्ड्यांवर कारखान्यांत वापरल्या जाणाऱ्या या वस्तू आणि रसायन सापडत आहेत. येथेच ही घातक रसायने जमिनीमध्ये जिरवली जात आहेत. रहिवासी वस्ती आणि शेतजमिनीशेजारी असणाऱ्या या भंगाराच्या अड्ड्यांमुळे ग्रामीण भागात धोकादायक वातावरण निर्माण झाले आहे. हाकेच्या अंतरावर प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. मात्र तक्र ार केल्याशिवाय येथील अधिकाऱ्यांना काहीच समजत नसल्याने हे कार्यालय आणि येथील अधिकारी असून नसल्यासारखेच आहेत. यामुळे कारखानदार आणि भंगार व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे.महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदार प्रदूषण कमी झाल्याचे छाती फुगवून सांगत आहेत. तसे पाहिले तर काही अंशी ते खरे देखील आहे. मात्र हे प्रदूषण कमी करण्यासाठी कारखानदारांनी भंगार व्यावसायिकांना हाताशी धरल्याचे समोर येत आहे. कारखान्यांचा हा कचरा आता भंगारवाल्यांच्या अड्ड्यावर दिसून येत आहे. कारखान्यांमध्ये हाऊस किपिंगचा ठेका काढला जातो. सर्वसामान्यांसाठी याचा अर्थ अंतर्गत साफसफाई असा असला तरी कारखानदारांच्या भाषेत हा भंगारचा ठेका असतो. यामध्ये कारखान्यातील टाकाऊ कागद, प्लास्टिक, लोखंडी सामानापासून ते वापरास अयोग्य सर्वच वस्तू या भंगार व्यावसायिकांच्या माथी मारल्या जातात. धंदा पाहिजे म्हणून हे भंगार व्यावसायिक कारखान्यांतून बाहेर टाकण्यात येणाऱ्या सर्वच वस्तू घेतात. यामुळे औद्योगिक वसाहत परिसरातील या भंगाराच्या अड्ड्यांवर अ‍ॅसिड, रसायनांचे छोटे मोठे कंटेनर, काचेच्या बाटल्या, रसायन वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी पाइपलाइन, प्रयोगशाळेतील सामान आदी साहित्य सापडते. या सामानाकडे भंगार म्हणून दुर्लक्ष केले तरी २०० लिटर ते एक हजार लिटरपर्यंतच्या केमिकलने भरलेल्या टाक्या देखील या भंगार अड्ड्यावर सापडतात. बिरवाडी टाकी कोंड, बिरवाडी कुंभार वाडा, देशमुख कांबळे, औद्योगिक वसाहतीतील रहिवासी झोन, मुंबई- गोवा महामार्गावर राजेवाडी गाव, इसाने कांबळे गाव हद्दीत अशा ठिकाणी हे भंगार अड्डे चालविले जात आहेत.महाड औद्योगिक वसाहत क्षेत्रालगत असलेल्या इसाने कांबळे गावहद्दीत आणि म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर मोठा भंगार अड्डा चालवला जात आहे. मूळच्या शेतजमिनीमध्ये मातीचा भराव टाकून हा अड्डा तयार करण्यात आला आहे. गतवर्षीच्या भंगार अड्ड्यावरील वायुगळती आणि चार कामगारांच्या मृत्यूनंतर महाड औद्योगिक वसाहतीतील जो भंगार अड्डा बंद के ला, तोच हा अड्डा आहे. या ठिकाणी राजरोसपणे केमिकल आणि भंगार उतरविले जात आहे.>दुर्घटना घडण्याची शक्यताकारखान्यांतील कामगार हा संबंधित केमिकल हाताळण्यासाठी प्रशिक्षित असतो. त्याला त्यासाठी आवश्यक सुरक्षा साधने पुरवलेली असतात. मात्र तसे कोणतेही प्रशिक्षण अगर सुरक्षा साधन भंगार व्यवसायावरील कामगारांना नसते. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अपघात या कामगारांच्या अगर शेजाऱ्यांच्या जिवावरही बेतू शकतो.गतवर्षीच्या दुर्घटनेचा विसरमहाड औद्योगिक वसाहतीतील एक्झोनेबल कारखान्याच्या समोरील एका बंद कारखान्याच्या जागी भंगार व्यवसाय सुरू होता. गतवर्षी या भंगाराच्या अड्ड्यावर वायुगळती झाली होती. यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला होता. भंगाराच्या अड्ड्यावर रसायन हाताळण्याचा संबंध काय? हा प्रश्न तेव्हा उपस्थित करण्यात आला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाड औद्योगिक वसाहत प्रशासनाने परिसरातील सर्वच भंगार व्यावसायिकांना नोटिसा बजावून जागा खाली करण्याचे आदेश दिले होते. गतवर्षी झालेल्या या वायुगळतीचा सर्वांनाच विसर पडला आहे.>भंगार व्यवसाय हा आमच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे त्यावर थेट कारवाई आम्ही कधीही केलेली नाही. जर भंगार व्यवसायाच्या माध्यमातून प्रदूषण होत असेल तर कारवाई केली जाईल. -सागर औटी, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड