शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

पुनर्वसन न झाल्याचा बारवीला फटका

By admin | Updated: August 24, 2016 03:20 IST

एमआयडीसीने निष्काळजीपणा दाखविल्याचा फटका जिल्ह्यातील मनपांना बसला असून बारवी धरणातील पाणीसाठा दुप्पट होण्याऐवजी अवघा ४० टक्के वाढला

ठाणे/बदलापूर : पुरेसा अवधी हाती असूनही धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात एमआयडीसीने निष्काळजीपणा दाखविल्याचा फटका जिल्ह्यातील मनपांना बसला असून बारवी धरणातील पाणीसाठा दुप्पट होण्याऐवजी अवघा ४० टक्के वाढला आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या जागी भेट देऊन ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारी यंत्रणांनी धरणग्रस्तांची कशी चेष्टा चालवली आहे, त्याचा ‘आँखो देखा हाल’ मांडल्यावर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. पुनर्वसन न झाल्याचा फटका बसेल या भीतीपोटी त्यांनी अपेक्षेइतके पाणीच यंदा साठवले नाही. मात्र मंगळवारी पहाटे धरण भरल्याची माहिती देत पाठ थोपटून घेतली. धरणाची उंची वाढवून १८ वर्षे उलटूनही पुनर्वसनाचा तिढा सोडवता न आल्याने जिल्ह्यातील अनेक मनपांत यंदाही डिसेंबर महिन्यापासून पुन्हा १५ टक्के पाणीकपात लागू होण्याची चिन्हे आहेत. एमआयडीसीचे अधिकारी याबाबत बोलण्यास तयार नाहीत.पावसाळ्यापूर्वी सलग पत्रकार परिषदा घेऊन बारवी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत भूमिका मांडणाऱ्या एमआयडीसी अधिकाऱ्यांनी गावांचे पुनर्वसन करण्याची तयारी पूर्ण झाल्याचे दावे केले होते. पाणीसाठा वाढत गेला की गावकऱ्यांना जबरदस्तीने हलवले जाईल, असे ते म्हणत होते. धरणाचे दरवाजे बसवण्याचे काम शिल्लक आहे. दरवाजे आलेही आहेत. पाण्याने योग्य पातळी गाठली की ते बसवले जातील असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र ४० टक्के पाणीसाठा वाढल्यावर उरलेले पाणी सांडव्यातून सोडून दिले जात आहे. वास्तविक, पुनर्वसनात दुर्लक्ष केल्याने ६० टक्के पाणी सोडून देण्याची वेळ आली आहे.>गावांची वेसही ओलांडली नाहीजी गावे धरणाच्या पाण्याखाली जाणार म्हणून एमआयडीसीचे अधिकारी गेले तीन महिने धावपळ करत होते, त्याच अधिकाऱ्यांनी मंगळवारी मात्र आपला पवित्रा बदलला. गावांच्या वेशीपर्यंत पाणी गेले की आम्ही पाणी अडवणे बंद करणार होतो. तसे पाणी वेशीवर गेले, त्यामुळे उरलेले पाणी सांडव्यातून सोडून देण्यास सुरूवात झाल्याचे ते सांगत होते. असे होते, तर मग पुनर्वसनाच्या बैठकांसाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत का धाव घेतली, वेशीपर्यंतच पाणी जाणार होते तर मग गावांनी आंदोलन का सुरू केले, याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते.