शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन न झाल्याचा बारवीला फटका

By admin | Updated: August 24, 2016 03:20 IST

एमआयडीसीने निष्काळजीपणा दाखविल्याचा फटका जिल्ह्यातील मनपांना बसला असून बारवी धरणातील पाणीसाठा दुप्पट होण्याऐवजी अवघा ४० टक्के वाढला

ठाणे/बदलापूर : पुरेसा अवधी हाती असूनही धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात एमआयडीसीने निष्काळजीपणा दाखविल्याचा फटका जिल्ह्यातील मनपांना बसला असून बारवी धरणातील पाणीसाठा दुप्पट होण्याऐवजी अवघा ४० टक्के वाढला आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या जागी भेट देऊन ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारी यंत्रणांनी धरणग्रस्तांची कशी चेष्टा चालवली आहे, त्याचा ‘आँखो देखा हाल’ मांडल्यावर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. पुनर्वसन न झाल्याचा फटका बसेल या भीतीपोटी त्यांनी अपेक्षेइतके पाणीच यंदा साठवले नाही. मात्र मंगळवारी पहाटे धरण भरल्याची माहिती देत पाठ थोपटून घेतली. धरणाची उंची वाढवून १८ वर्षे उलटूनही पुनर्वसनाचा तिढा सोडवता न आल्याने जिल्ह्यातील अनेक मनपांत यंदाही डिसेंबर महिन्यापासून पुन्हा १५ टक्के पाणीकपात लागू होण्याची चिन्हे आहेत. एमआयडीसीचे अधिकारी याबाबत बोलण्यास तयार नाहीत.पावसाळ्यापूर्वी सलग पत्रकार परिषदा घेऊन बारवी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत भूमिका मांडणाऱ्या एमआयडीसी अधिकाऱ्यांनी गावांचे पुनर्वसन करण्याची तयारी पूर्ण झाल्याचे दावे केले होते. पाणीसाठा वाढत गेला की गावकऱ्यांना जबरदस्तीने हलवले जाईल, असे ते म्हणत होते. धरणाचे दरवाजे बसवण्याचे काम शिल्लक आहे. दरवाजे आलेही आहेत. पाण्याने योग्य पातळी गाठली की ते बसवले जातील असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र ४० टक्के पाणीसाठा वाढल्यावर उरलेले पाणी सांडव्यातून सोडून दिले जात आहे. वास्तविक, पुनर्वसनात दुर्लक्ष केल्याने ६० टक्के पाणी सोडून देण्याची वेळ आली आहे.>गावांची वेसही ओलांडली नाहीजी गावे धरणाच्या पाण्याखाली जाणार म्हणून एमआयडीसीचे अधिकारी गेले तीन महिने धावपळ करत होते, त्याच अधिकाऱ्यांनी मंगळवारी मात्र आपला पवित्रा बदलला. गावांच्या वेशीपर्यंत पाणी गेले की आम्ही पाणी अडवणे बंद करणार होतो. तसे पाणी वेशीवर गेले, त्यामुळे उरलेले पाणी सांडव्यातून सोडून देण्यास सुरूवात झाल्याचे ते सांगत होते. असे होते, तर मग पुनर्वसनाच्या बैठकांसाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत का धाव घेतली, वेशीपर्यंतच पाणी जाणार होते तर मग गावांनी आंदोलन का सुरू केले, याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते.