शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

स्पेशल म्हणून खव्याचीच बर्फी

By admin | Updated: September 22, 2016 03:29 IST

महागड्या दरात मावा किंवा खव्याची विक्र ी केली जात असल्याची बाब ठाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गणेशोत्सवात केलेल्या कारवाई समोर आली

पंकज रोडेकर,

ठाणे- कायद्याच्या पळवाटा शोधून ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात बेधडक पणे स्पेशल बर्फीच्या नावाखाली ४०० ते ५०० रुपये दराने महागड्या दरात मावा किंवा खव्याची विक्र ी केली जात असल्याची बाब ठाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गणेशोत्सवात केलेल्या कारवाई समोर आली आहे. त्यामुळे ठाणे आणि रायगडकर नागरिकांनो यापुढे सावधान. ही स्पेशल बफर् ी अहमदाबाद येथून १०, २० किंवा ३० रूपये किलो दराने अशी पोत्यातून कोकणात येत आहे.ती मिळेल त्या जागेत ठेवून विक्रेते त्यामार्फत अधिक नफा कमविण्याच्या नादात नागरिकांच्या जीवाश्ी खेळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा गणेशोत्सवात आणि त्यापूर्वीच ठाणे एफडीएने विशेष मोहीम हाती घेतली होती. याचदरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तसेच रायगड येथे टाकलेल्या तीन छाप्यात एकूण ८ लाखांचा मावा- खवा जप्त केला होता. त्यामधील कल्याण आणि अंबरनाथ येथे हा खवा अस्वच्छता असलेल्या ठिकाणी साठवून ठेवल्याचे समोर आले. मात्र, तो आता नष्ट करण्यात आला आहे. ही मोहिम राबविताना, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीच्या प्रत्येक ठिकाणीहून मावा-खव्यांचे नमुने घेतलेले आहेत. यंदा कोकणात स्पेशल बर्फीच्या नावाखाली जो काही प्रकार सुरु झालेला आहे. त्याला वेळीच निर्बंध घालण्यासाठी एफडीएने जणू दंड थोपटले आहेत. कोकणात अशाप्रकारे बर्फी येत असण्याचे उघड झाल्यावर त्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करुन ठाणे एफडीएने तपासणी मोहीम तीव्र करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नमुने घेणे सुरू केले असून ही तपासणी मोहिम आगामी दिवाळीच्या कालावधीपर्यंत राबविण्यात येणार आहे. ही पद्धत वेळीच बंद करण्याचा पुरेपुर प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.>आदेशानुसार कारवाई जोरातगणेशोत्सवात कोकण विषबाधेची एकही घटना नाही. गणेशोत्सवात कोकणातील एकाही जिल्ह्यात विषबाधाची घटना घडली नसल्याचा दावा एफडीए ने केला. वरिष्ठांचे आदेशाचे पालन करून मिठाईच्या प्रत्येक दुकानात जाऊन पाहणी केली. तसेच करवाई करण्यास मागे पुढे पाहिले नसल्याचे एफडीएकडून सांगण्यात येत आहे.>नागरिकांना चांगला आणि दर्जेदार मावा- खवा मिळावा. म्हणून स्पेशल बर्फीची बाब पुढे आल्यावर तत्काळ संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. - सुरेश देशमुख -सह आयुक्त एफडीए (कोकण विभाग)