शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

खर्डीतील बाप्पा निघाले मुंबईला

By admin | Updated: August 25, 2016 03:10 IST

मूर्तिकार रामभाऊ जाधव बुवा यांच्या कारखान्यात गणेशमूर्तींवर रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरवला जातोय.

मनीष दोंदे,

खर्डी- येथील दळखण चक्र भागात राहणारे मूर्तिकार रामभाऊ जाधव बुवा यांच्या कारखान्यात गणेशमूर्तींवर रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरवला जातोय. यंदा त्यांच्या कारखान्यात बाजीरावाच्या वेशातील बाप्पाच्या मूर्तींना जास्त मागणी आहे. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन येथे शाडूच्या मूर्तींना जास्त मागणी असल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्याही मूर्ती कमी बनवाव्या लागतात, असे रामभाऊ यांचा मोठा मुलगा अर्जुन याने सांगितले.या मूर्ती केवळ हाताने बनवत असल्याने त्यातील कलाकुसर देखणी व बघण्यासारखी असल्याने त्यांनी बनवलेल्या मूर्तींना खर्डी परिसराबरोबरच कसारा, शहापूर, डोळखांब, मुरबाड, वाडा, कल्याण, डोंबिवली, ठाणे, तसेच चेंबूर (मुंबई) आदी ठिकाणांवरून मागणी असते. साधारण दोन महिने अगोदर पाहिजे असलेल्या मूर्तींचे फोटो आणि पाट येथील कारखान्यात दिले जातात. त्यात्या फोटोप्रमाणे बाप्पांची मूर्ती बनवली जाते. सुमारे ३५ वर्षांपूर्वी रामभाऊंनी बाप्पाच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्याला आपल्या छोट्याशा घरात सुरु वात केली होती. त्यांची पत्नी त्यांना माती मळून देण्यासाठी मदत करीत असे. आता या कामात दोन्ही मुले मदत करतात. या कारखान्याच्याच आधारावर ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. अल्पसे शिक्षण झालेल्या रामभाऊंनी मुंबईत राहत असताना मूर्ती बनण्याची कला, कारखान्यात माती मळणे आदी कामे करत असताना आत्मसात केली. त्यासाठी कुठेही शिक्षण घेतले नाही. मात्र, जिद्द आणि उपजत असलेल्या कलेमुळे या क्षेत्राकडे वळले. आज आपण मुंबई येथील मंत्रालयाशेजारील असणाऱ्या आमदार निवासावर जे राजमुद्रा असलेले चिन्ह पाहतो, ते रामभाऊंनी बनवलेले आहे.या कामात आता खूपच बदल झाले आहेत. मूर्ती बनवण्याचा खर्चसुद्धा खूपच वाढला आहे. यासाठी लागणारी माती गुजरातमधील भावनगर येथून आणावी लागते. तेथून आणण्यासाठी वाहतूक खर्च जास्त लागत असल्याने कल्याणातील एका व्यापाऱ्याकडून ती खरेदी केली जाते. पूर्वी ३५ किलोच्या एका गोणीला ३० रु पये लागत. मात्र, आता त्याच गोणीला साडेपाचशे रु पये मोजावे लागतात. रंगांचेही भाव गगनाला भिडले आहेत. केवळ आपली कला पुढच्या पिढीने पुढे जोपासावी व बाप्पाची सेवा करावी, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कारखाना सुरू ठेवल्याचे रामभाऊंनी सांगितले.