शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मद्यविक्री बंदीचा वाइन उद्योगाला फटका

By admin | Updated: April 9, 2017 00:15 IST

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्रीवर घातलेल्या बंदीचा फटका वाइन विक्रीलाही बसला असून, ही बंदी अशीच कायम राहिली

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्रीवर घातलेल्या बंदीचा फटका वाइन विक्रीलाही बसला असून, ही बंदी अशीच कायम राहिली तर कोट्यवधी लिटर उत्पादित वाइन मातीमोल ठरण्याची भीती आॅल इंडिया वाइन प्रोड्युसर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.सर्वाधिक नुकसान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे होणार असल्याने पाचशे मीटर बंदीतून वाइन विक्रीला सूट मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वाइन उद्योगाला संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करावी, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही असोसिएशनने पत्रकार परिषदेत दिली. सध्याच्या हंगामात वाइन उत्पादकांनी शेतकऱ्यांशी करार करून ४० ते ६० रुपये किलो दराने द्राक्ष खरेदी करून वाइनचा सुमारे एक कोटी लिटर इतका साठा करून ठेवला आहे. वाइनची विक्रीच होणार नसेल तर या साठ्याचे काय करायचे, असा प्रश्न उभा आहे. राज्यात ८० वायनरी असून एकट्या नाशिक जिल्ह्यातील संख्या ४२ इतकी आहे व त्यासाठी चार हजार एकरवर वाइनच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. जर वाइनची विक्रीच होणार नसेल तर पुढच्या वर्षी शेतकऱ्यांच्या द्राक्षांची खरेदी होणार नाही, पर्यायाने शेतकऱ्यांना बागा नष्ट कराव्या लागतील, असे असोसिएशनचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)