शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सोलापुरात ३०० कोटींचे बँक व्यवहार ठप्प

By admin | Updated: July 29, 2016 18:13 IST

केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सरकारी बँकांच्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या एक दिवसाच्या संपामुळे सोलापूर जिल्ह्यातील ३०० कोटी रूपयांचे

सरकारी बँकांचा संप : साडेतीन हजार कर्मचाऱ्यांचा सहभागसोलापूर : असोसिएट बँकांचे स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सरकारी बँकांच्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या एक दिवसाच्या संपामुळे सोलापूर जिल्ह्यातील ३०० कोटी रूपयांचे बँक व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील विविध सरकारी बँकांच्या २६० शाखांमधील ३५०० कर्मचाऱ्यांनी या संपात भाग घेतला होता.युनायटेड फोरम आॅफ बँक असोसिएशनच्या नेतृत्त्वाखाली देशभरात हा संप पुकारण्यात आला होता. विविध संघटनांशी संबंधित असलेले सुमारे दोनशे कर्मचारी बाळीवेस येथील स्टेट बँकेसमोरजमा झाले. तेथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून दीड तास निदर्शने केली. जिल्ह्यातील बँकांमधील धनादेश क्लिअरींग, रक्कम काढणे, भरणे, आरटीजीएस आदी सर्व सेवा बंद असल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली.युनायटेड फोरमचे निमंत्रक गोपाळ गायकवाड यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या या धोरणामुळे सरकारी बँका बंद होतील. स्पर्धेमुळे सामाजिक बँकींग प्रभावित होईल. देशाच्या आर्थिक विकासात बँकांची भूमिका मोठी आहे. यामुळे विकासावरही विपरित परिणाम होईल. एकाच बँकेत सर्व बँका विलीन होणार असल्यामुळे एकाधिकार वाढीस लागेल. बँकांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी आणि अधिकारी अतिरिक्त होतील. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बळकट केले पाहिजे.या आंदोलनात गायकवाड यांच्यासह प्रकाश जाधव, वीरभद्र माळगे, अंबिका डोळ्ळे, रजनी कुलकर्णी, रोहिणी दुस्सल, अलमेदा, जयतीर्थ पडगानूर, अधिकारी संघटनेचे धनंजय शेंडे, अंगद पाटील यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.