शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात बांगलादेशींचे बेकायदा वास्तव्य

By admin | Updated: January 20, 2017 02:52 IST

भारताच्या सीमाभागातून घुसखोरी करून आलेल्या बांगलादेशीयांनी विविध शहरात बेकायदेशीर वास्तव्य केले आहे.

नवी मुंबई : शहरात बांगलादेशीय नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. भारताच्या सीमाभागातून घुसखोरी करून आलेल्या बांगलादेशीयांनी विविध शहरात बेकायदेशीर वास्तव्य केले आहे. सायबर सिटीतही गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशीयांचे बेकायदा वास्तव्य वाढले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणे पोलिसांनी तीस नागरिकांना ताब्यात घेतले आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या नवी मुंबई शहराला भिकाऱ्यांचा वेढा पडला आहे. त्याचबरोबर बेकायदा बांगलादेशीय नागरिकांचे वास्तव्य सुध्दा वाढले आहे. विशेषत: गाव-गावठाणातून उभारलेल्या चाळी, फिफ्टी-फिफ्टीच्या इमारती तसेच झोपडपट्ट्यांतून बांगलादेशीय नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांवरही या नागरिकांचा डेरा दिसून येतो. कामोठे, खारघर, उलवे, नवीन पनवेल तसेच नैना क्षेत्रातील नव्याने उभारल्या जात असलेल्या बांधकाम प्रकल्पांवर मजूर म्हणून काम करणाऱ्यांत या बांगलादेशीय नागरिकांची संख्या मोठी आहे, तर काही बांगलादेशीय महिला घरकाम करतात. कोपरखैरणे परिसरात अशा महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. कोपरखैरणे गावातील खाडी किनाऱ्यावर वसलेल्या झोपड्यांतून अनेक बांगलादेशीय नागरिक राहत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी धाड टाकून तीस नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. दोन वर्षांपूर्वी खारघर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे एका बांधकाम प्रकल्पांवर धाड टाकून अनेक बांगलादेशींची धरपकड केली होती. (प्रतिनिधी)>बांगलादेशींकडे रहिवासी पुरावेदेशात घुसखोरी करून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या अनेक बांगलादेशीय नागरिकांकडे शिधापत्रिका, पॅन कार्ड तसेच आधार कार्ड असल्याचे आढळून आल्याचे यापूर्वीच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशाप्रकारे बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.