शहरं
Join us  
Trending Stories
1
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
2
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
3
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
4
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
5
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
6
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
7
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
8
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
9
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
10
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
11
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
12
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं
13
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
14
Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती?
15
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
16
सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
17
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
18
विमान प्रवास होणार स्वस्त? विमान इंधनाच्या किमती सलग तिसऱ्यांदा घटल्या; काय आहेत सध्याचे दर?

सलोख्याचा ‘बुरोंडी पॅटर्न’ राज्यभर!

By admin | Updated: February 15, 2015 01:37 IST

राज्यभर पोहोचताच राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी या अनोख्या उपक्रमाची दखल घेत बुरोंडी ग्रामस्थांचे कौतुक केले.

पोलीस महासंचालकांनी घेतली दखल : पोलिसांनी गावात वाटले पेढेशिवाजी गोरे - दापोली (जि. रत्नागिरी)दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील हिंदू-मुस्लीम समाजाने केलेला सामाजिक सलोख्याचा करार ‘लोकमत’च्या माध्यमातून राज्यभर पोहोचताच राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी या अनोख्या उपक्रमाची दखल घेत बुरोंडी ग्रामस्थांचे कौतुक केले. विशेष म्हणजे सलोख्याचा हा ‘बुरोंडी पॅटर्न’ राज्यभर राबविण्याचा निश्चयही त्यांनी केला आहे.बुरोंडीतील हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र येत १०० वर्षांचा सामाजिक सलोख्याचा करार केला. कधी काळी जातीय तणावाखाली असलेले हे गाव आज गुण्यागोविंदाने नांदत आहे. सर्व सण-उत्सव सर्वधर्मसमभावाने साजरे होत आहेत. बुरोंडीकरांनी उचलेले हे प्रागतिक पाऊल ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रकाशात येताच पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बुरोंडी गावात पाठवून गावच्या या उपक्रमाचे जाहीर कौतुक करण्यास सांगितले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी बुरोंडी गावाला भेट देऊन गावकऱ्यांचे अभिनंदन केले आणि गावभर पेढेही वाटले.‘लोकमत’चे आभारसामाजिक सलोख्याची दखल घेत बुरोंडी ग्रामस्थांचा उपक्रम राज्यभर पोहोचवल्याबद्दल बुरोंडीच्या ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार व्यक्त केले. ‘लोकमत’ने हे वृत्त १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते.संवेदनशील गावाचा कलंक या कराराने पुसला असून, आता नवा पायंडा सुरू झाला आहे. गावात किंवा पंचक्रोशीत समन्वय समितीची जबाबदारी वाढली आहे. सामाजिक सलोख्याची जबाबदारी आम्ही नक्कीच पेलू. - प्रदीप राणे, सरपंच, बुरोंडी