शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

बालगुन्हेगारही लष्करी सेवेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 04:28 IST

बालगुन्हेगार म्हणून शिक्षा झाली असेल तरी अशी व्यक्ती प्रौढपणी भारतीय लष्करातील सेवेसाठी अपात्र ठरत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला

मुंबई: एखाद्या व्यक्तीला अल्पवयीन असताना फौजदारी गुन्हयात दोषी ठरून बालगुन्हेगार म्हणून शिक्षा झाली असेल तरी अशी व्यक्ती प्रौढपणी भारतीय लष्करातील सेवेसाठी अपात्र ठरत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील कांजळा गावातील कैलास संभाजी लोहकरे या अभियांत्रिकी पदविकाधारक तरुणाची लष्करात यांत्रिकी सैनिक म्हणून झालेली रीतसर निवड तो बालगुन्हेगार आहे या कारणावरून रद्द केली गेली होती. त्याविरुद्ध कैलासने केलेली याचिका मंजूर करताना न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. संगीतराव पाटील यांच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने हा निकाल दिला.लष्कराच्या भरती अधिकाऱ्यांनी कैलासला बालगुन्हेगार म्हणून पूर्वी दोषी ठरविले होते हा मुद्दा बाजूला ठेवून त्याच्या पात्रतेचा अन्य निकषांवर निर्णय करावा व त्यात तो पात्र ठरत असेल तर आणखी विलंब न लावता सहा आठवड्यांत त्याला यांत्रिकी सैनिक म्हणून रुजू करून घ्यावे, असा आदेश खंडपीठाने दिला.पाच वर्षांपूर्वी उस्मानपूरा पोलिसांनी कैलाससह इतरांवर भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला होता. त्यावेळी कैलास अल्पवयीन होता. त्यामुळे त्याचा खटला बालगुन्हेगारी न्यायालयाच्या दंडाधिकाऱ्यांपुढे गेला. तेथे कैलासने गुन्हा कबुल केल्यावर न्यायालयाने त्याला औपचारिकपणे दोषी ठरवून पुन्हा असा गुन्हा न करणयाची समज देऊन घरी जाऊ दिले होते.यानंतर कैलास शिकला व त्याने अभियांत्रिकी पदविका मिळविली. गेल्या वर्षीच्या जानेवारीत भारतीय लष्करातर्फे औरंगाबाद येथे खुली सैन्यभरती झाली त्यात कैलास सहभागी झाला.सर्व चाचण्या यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन त्याची यांत्रिकी सैनिक म्हणून निवड झाली. नंतर मूळ कागदपत्रे सादर केली त्यात पोलिसांचा अहवालही होता व त्यात कैलासला बालगुन्हेगार म्हणून पूर्वी दोषी ठरविले गेल्याची नोंद होती. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यावर बोट ठेवून कैलासला झालेली निवड रद्द करण्यात आल्याचे कळविले.लष्कराने आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना असे सांगितले की, आमच्या भरती नियमांमध्ये कोणत्याही फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरलेले असणे ही पूर्णपणे अपात्रता ठरविलेली आहे. मात्र हे फेटाळून लावताना न्यायालयाने म्हटले की,इतर कोणत्याही कायद्यांत काहीही म्हटलेले असले तरी बालगुन्हेगाराला झालेली शिक्षा ही त्याच्यादृष्टीने कोणतीही अपात्रता ठरणार नाही, अशी स्पष्ट तरतूद बालगुन्हेगारी कायद्यात आहे. हा संसदेने केलेला कायदा असल्याने लष्कराने केलेले प्रशासकीय नियम याहून वरचढ आणि विपरीत असू शकत नाहीत.या सुनावणीत याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एस. जी. जाधवार यांनी, राज्य सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील ए.व्ही. देशमुख यांनी तर केंद्र सरकार व लष्करासाठी अ‍ॅड. डी.एल. नागोले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)>दुसरी विनंती अमान्य : बालगुन्हेगारी कायद्याखाली चालणाऱ्या खटल्याचे रेकॉर्ड अपिल करण्याचा काळ लोटल्यानंतर नष्ट करण्याचीही त्या कायद्यात तरतूद आहे. प्रस्तूत प्रकरणात पोलिसांनी ते नष्ट केले नाही. तरी त्यांना ते नष्ट करण्याचा आदेश द्यावा, अशी कैलासही दुसरी विनंती होती. मात्र ती अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, त्या गुन्ह्यातील इतर गुन्हेगार अल्पवयीन नव्हते व त्यांच्यावरील खटला अद्याप सुरु असल्याने रेकॉर्ड नष्ट करता येणार नाही.