शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीला उखडा - अमित शाहंचा मुंबईत एल्गार

By admin | Updated: September 4, 2014 19:43 IST

निवडणुका कुणाच्या लाटेमुळे जिंकता येत नाहीत किंवा नेत्याच्या चांगल्या वक्त्यामुळे जिंकता येत नाहीत तर घरोघरी प्रचार करून कठोर परीश्रम घेणा-या कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणुका जिंकता येतात

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - निवडणुका कुणाच्या लाटेमुळे जिंकता येत नाहीत किंवा नेत्याच्या चांगल्या वक्त्यामुळे जिंकता येत नाहीत तर घरोघरी प्रचार करून कठोर परीश्रम घेणा-या कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणुका जिंकता येतात असे सांगत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी विजय संकल्प मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकले. काँग्रेस व राष्ट्रवादीचा कठोर शब्दांमध्ये समचार घेतलेल्या आपल्या भाषमामध्ये अमित शाह यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्या चर्चा अफवांकडे दुर्लक्ष करावं, युती, जागावाटप, उमेदवार आदी बाबी नेत्यांवर सोडाव्या आणि फक्त विजयासाठी परीश्रम घ्यावेत असा सल्ला शाह यांनी दिला.
शाह यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:
- अमेरिका इतकी वर्षे नरेंद्र मोदींशी कसे वागले हे आपण बघितलं आता तेही सबका साथ सबका विकास म्हणतायत.
- केंद्रामध्ये भाजपाचे यशस्वी सरकार हवं असेल आणि देश काँग्रेसमुक्त करायचा असेल तर महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करावा लागेल.
- कार्यकर्त्यांनीच नाही तर भाजपाच्या नेत्यांनी राज्यभरातल्या घराघरात जायला हवं, शिवाजी महाराजांची आठवण आणि नरेंद्र मोदींचा संदेश देत सत्तापरीवर्तनासाठी कठोर परीश्रम घ्यायला हवेत.
- राजाच्या नियतीमध्ये खोट असेल तर निसर्गपण मदत करत नाही असे सांगताना दुष्काळग्रस्त गुजरातमध्ये १२ वर्षांत दुष्काळानं झोडपलं नाही तर महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षांत सात वेळा दुष्काळ पडल्याचं सांगताना असं पापी सरकार उखडून टाका असं शाह म्हणाले.
- एकेकाळी देशाचे सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्व करत होतं. परंतु गेल्या १५ वर्षांमध्ये परिस्थिती अशी बदलली की प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र मागे पडला व त्याला काँग्रेस व राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे शाह म्हणाले. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना त्यांनी दाऊद इब्राहिमसारख्या माफियांपासून महाराष्ट्राला सोडवलं असं शाह म्हणाले.
- पाकिस्तानशी चर्चा तोडण्याचा व जागतिक व्यापार संघटनेमध्ये आधीच्या चुकीच्या निर्णयाला फिरवण्याचा निर्णय भाजपाच्या खंबीर सरकारने त्वरीत घेतल्याचे सांगत त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. यावेळी त्यांनी कृषिमंत्री शरद पवारांनी उद्योजकांच्या फायद्यासाठी शेतक-यांचा विश्वासघात केल्याची टीका केली.
- विकास हे या देशाचं पहिलं उद्दिष्ट आहे, पण त्याचबरोबर सम्मानपूर्वक जगायला हवं असं सांगतानाच शाह यांनी मोदी यांच्यावर कौतुकाची उधळण केली. मोदींसारखा पंतप्रधान मिळाला हे आपलं भाग्य असल्याचं सांगतानाच त्यांचं स्वप्न महाराष्ट्रात काँग्रेसला उखडण्याचं असल्याचं भावनिक आवाहन त्यांनी केलं.
- महाराष्ट्रातपण भाजपानं असा विजय मिळवायला हवा की केंद्राप्रमाणेच इथेही विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी काँग्रेसला झगडावं लागायला हवं - अमित शाह
- काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नातेवाईकांच्या घरात ११ लाख कोटी रुपये पोचल्याचा आरोप करतानाच महाराष्ट्रातून काँग्रेसला उखडण्याचं काम भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करायला हवं असं त्यांनी ठासून सांगितलं.
- गेल्या १५ वर्षांमध्ये आघाडी सरकारने ११.८८ लाख करोड रुपये आघाडी सरकारने खाल्याचा आरोप शाह यांनी केला. त्यांच्या घोटाळ्यांची यादी एवढी मोठी आहे की भागवत सप्ताहाचा आठवडा कमी पडेल अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य नाही तर सुराज्य स्थापन केल्याचे सांगताना औरंगजेबाला टक्कर देत पहिल्यांदा स्वराज्य स्थापना शिवाजी महाराजांनी केल्याचे अमित शाह म्हणाले.
- महाराष्ट्राने चारीत्र्यवान नेत्यांची फौज दिली होती, आता पुन्हा भाजपा असेच चारीत्र्यवान नेत्यांना पुढे आणेल असे शाह म्हणाले. गेल्या १५ वर्षांत सध्याच्या सरकारने देशभरात महाराष्ट्राचे नाव खराब केल्याचे ते म्हणाले.