शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बाळासाहेबांनी केलेले उपकार गुजराती विसरले - संजय राऊत

By admin | Updated: October 26, 2014 14:32 IST

बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबईत मोठ्या प्रमाणात गुजराती समाजावर अनेक उपकार केले. मात्र याचा गुजराती समाजाला विसर पडला अशी खंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ -  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबईत मोठ्या प्रमाणात गुजराती समाजावर अनेक उपकार केले. मात्र या उपकारांचा गुजराती समाजाला विसर पडला अशी खंत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नावानेच मतदान झाले व त्यामुळेच भाजपाला यश मिळाले अशी कबुलीही त्यांनी दिली आहे. 
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले आहे. यामध्ये राऊत म्हणतात, गुजराती समाज महाराष्ट्रात राहुनही जात व प्रांतासाठी गुजराती समाज शिवसेनेविरोधात गेला व भाजपाला मतदान केले. प्रचंड काम करुनही सुभाष देसाई, विनोद घोसाळक, पांडुरंग सपकाळ यांचा पराभवा हे याचेच लक्ष आहे. 
शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर किमान २०० जागांवर विजय मिळाला असता. मात्र दुर्दैवाने हे शक्य झाले नाही व शेवटी जनतेने दोघांनाही एकत्र या आणि सत्ता स्थापन करा या वळणावर आणून ठेवले. एमआयएममुळे भाजपाला फायदा झाला असेल. मात्र या नादात हिरवा विषारी साप विधानसभेत गेला. या निवडणुकीत एमआयएमचा उदय व मनसेचा अस्त झाला अशी मतही त्यांनी व्यक्त केले आहे. विदर्भातील नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले तर विदर्भाचा विकास होईल असेही त्यांनी म्हटले आहे.