शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

बालगोविंदा आणि हंडीच्या २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बंदी कायम

By admin | Updated: August 17, 2016 14:21 IST

दहीहंडी उत्सवजवळ आला असताना सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवासंबंधी महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

ऑनलाईन कायम 

मुंबई, दि. १७ - दहीहंडी उत्सव जवळ आला असताना सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवासंबंधी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा २०१४ सालचा निर्णय कायम ठेवला आहे. 
 
या निर्णयानुसार बाल गोविंदावरील बंदी कायम ठेवताना दहीहंडींची कमाल उंची २० फुटांपेक्षा जास्त नसावी असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या नियमांबद्दलचा संभ्रम दूर झाला आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे १८ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडी पथकात सहभागी होता येणार नाही. दहीहंडी नियमांबद्दल सुस्पष्टता यावी यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. 
 
मुंबईत दहीहंडी उत्सव न रहाता इव्हेंटचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुंबईत गलोगल्ली लागणा-या लाखो रुपयांच्या हंडया फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये जीवघेणी स्पर्धा वाढत चालली होती. यामध्ये हंडी फोडताना पडून अनेक गोविंदा जखमी व्हायचे. काहींचा मृत्यू व्हायचा. म्हणून दहीहंडी उत्सवाला नियमांमध्ये बसवण्यासाठी उच्च न्यायालयाच याचिका दाखल झाल्या होत्या. 
 
उच्च न्यायालयाने हंडीतील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेऊन हंडीची उंचीवर काही मर्यादा आणल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निकालामुळे विक्रमी उंची गाठण्याची स्पर्धा करणारी गोविंदा पथके निराश होणार आहेत. 
 
ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांचे संघर्ष, सचिन भाऊ अहिर यांचे संकल्प दहीहंडी उत्सवाचे मुख्य आयोजक आहेत. गेल्यावर्षी जाचक नियमांचा कारण पुढे करुन या दोन्ही नेत्यांनी दहीहंडीचे आयोजन टाळले होते.