शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

बाई गं... गॅस नको, आपली चूलच बरी!

By admin | Updated: March 2, 2017 01:23 IST

गॅस सिलिंडरच्या टाक्यांच्या किमतीत भरमसाट वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडले आहे.

काऱ्हाटी : एकीकडे आर्थिक मंदी, दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्यांच्या किमतीत भरमसाट वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे विशेषत: महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा धुराच्या चुली पेटत असल्याचे चित्र आहे. धुरामुळे महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे गॅस वापर अधिक व्हावा, यासाठी प्रचार, प्रसार होत असताना सध्या उलटे चित्र दिसत आहे.केंद्र सरकारने मध्यंतरी गॅसवरील अनुदान बंद केले. तसेच, काही गॅस सिलिंडर अनुदानावर सवलत देण्याची घोषणा केली. मात्र, विनाअनुदानित गॅस सिलिंडर सुरुवातीला पूर्ण रक्कम भरून घ्यावी लागते.पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या खर्चात वाढ होत आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या एका टाकीमागे जवळपास ५०० रुपयांची वाढ झाली आहे. आज १ मार्चपासून ९० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ दाखवणाऱ्या सरकारने महिला, गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याचे काम केले आहे. भरमसाट वाढवलेल्या किमतीमुळे घरगुती गॅस परवडेनासा झाला आहे. या सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. पेट्रोलचा दर अकरा महिन्यांत तब्बल १७ रुपयांनी व घरगुती गॅस सिलिंडरच्या एका टाकीमागे ५०० रुपयांनी भरमसाट वाढ केली आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारभाव देण्याबाबत शासन कोणतेच पाऊल उचलत नाही. मात्र, शेतकऱ्यांकडे पिकत नसलेल्याच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे.जिरायती भागातील खेड्यापाड्यात तसेच वाड्या-वस्त्यांमध्ये चुली पेटू लागल्या आहेत. एकीकडे पैसा पाहावयास मिळेना, त्यातच वाढलेल्या गॅसच्या किमतीमुळे स्वयंपाकासाठी शेतकरी महिलांना सरपण गोळा करण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठीपूर्वीचे दिवस पाहण्याची वेळ आली असल्याचे काऱ्हाटीच्या सुजाता लोणकर या सुशिक्षित महिलेने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.