शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीसाठी दीड कोटीची मागणी,बडोले यांचे चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:09 IST

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आपल्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आपल्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेचे मेहकर (जि.बुलडाणा) येथील आमदार संजय रायमूलकर यांनी आज विधानसभेत केला. या प्रकरणी चौकशीचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, नगरसेवकांची पदे रद्द होत आहेत. जात पडताळणीची लाखो प्रलंबित प्रकरणे आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी विधानासभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे किशोर पाटील यांनी जात पडताळणी समित्या गरिबांची लूट करत असून, ती रोखण्यासाठी कायदा करणार का? असा सवाल केला. या चर्चेदरम्यान जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी आपणाकडे दीड कोटी रुपये मागितले गेल्याचे शिवसेनेचे रायमुलकर यांनी सभागृहात सांगताच, सर्व सदस्यांनी संतापव्यक्त केला.रायमूलकर यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत, आमदाराकडे दीड कोटी मागितले जातात ही गंभीर बाब असून, त्यावर मंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे, अशी मागणी केली. त्यावर चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन बडोले यांनी दिले.वडिलांना प्रमाणपत्र नाहीवडिलांच्या प्रमाणपत्रावर मुलाला प्रमाणपत्र दिले जाते, पण मुलांकडे प्रमाणपत्र असताना वडिलांना दिले जात नसल्याचे भाजपाचे संजय सावकारे यांनी सांगितले. या प्रकरणी जबाबदार अधिकाºयांवर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी केला. यावर संबंधित प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, मुलांच्या प्रमाणपत्राच्या आधारे वडिलांना प्रमाणपत्र देण्यासाठी येत्या दोन महिन्यांत कार्यवाही केली जाईल, असे सामाजिक न्यायमंत्र्यांनी सांगितले.कोल्हापूरचे आमदार आक्रमककोल्हापूरच्या पाच नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी नगरसेवकपद रद्द होण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यावर शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील आक्रमक झाले. संतप्त झालेले आबिटकर हे वेलमध्ये उतरले. शिवसेनेचे उल्हास पाटील यांनी जात प्रमाणपत्र समितीतील पोलीस अधिकारी निलंबित झाले आहेत. असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत, याकडे लक्ष वेधले. तेव्हा आठ दिवसांत सर्व प्रलंबित प्रमाणपत्रे दिली जातील, असे मंत्री बडोले यांनी सांगितले.समित्यांना अध्यक्षच नाहीत-राज्यामध्ये ३६ जात पडताळणी समित्या आहेत. मात्र, त्यावर बहुतांश समित्यांवर अध्यक्षाची नेमणूकच नसल्याचे अजित पवार यांनी, या वेळी सभागृहाच्या निदशर्नास आणून दिले. नागरिकांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही, हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप पवार यांनी केला. यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी उस्मानाबादमध्ये जात पडताळणीची १०७७ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती दिली. निवडणुकीसंदर्भात काही त्रुटीची प्रकरणे असतात. त्यामुळे प्रमाणपत्र देण्यास विलंब होतो. प्रलंबित प्रकरणे पुढील आठ दिवसांत निकालात काढू, असे आश्वासन बडोले यांनी दिले.