शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

वैदू समाजाची जात पंचायतीला मूठमाती

By admin | Updated: March 16, 2015 10:36 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतींविरोधात उभारलेल्या लढ्याला रविवारी मोठे यश मिळाले. आधुनिक युगात जात पंचायत ही संकल्पना कालबाह्य व

अहमदनगर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतींविरोधात उभारलेल्या लढ्याला रविवारी मोठे यश मिळाले. आधुनिक युगात जात पंचायत ही संकल्पना कालबाह्य व कायद्याच्या विरुद्ध असल्याची स्पष्ट जाणीव झाल्याची कबुली देत वैदू समाजाने जात पंचायत बरखास्त करण्याची घोषणा श्रीरामपूर येथील बैठकीत केली.अखिल भारतीय वैदू समाजाचे नेते चंदर बापू दासरजोगी, श्यामलिंग मारुती शिंदे, मल्लू मारुती शिंदे तसेच ‘अंनिस’च्या जात पंचायत मूठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे, नगर जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे, आसिफ शेख यांच्या साक्षीने वैदू समाजाने हे ऐतिहासिक पाऊल उचलले. जात पंचायत कालबाह्य झाल्याचे पंचायतीनेच जाहीर केले. यापुढे समाजबांधवांनी प्रगती व विकास साधावा. शैक्षणिक व सामाजिक विकासाला प्राधान्य देत अनिष्ट रुढी परंपरांना फाटा द्यावा. समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. राज्य घटनेच्या चौकटीत राहून आचरण व विचारात बदल करावा. सामाजिक परिवर्तनाचे कार्य जोपासावे, असे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रबोधनामुळे जाणीव झाल्याचे बरखास्तीच्या घोषणापत्रात नमूद करून वैदू समाजाने परिवर्तनाच्या दिशेने नवे पाऊल टाकत असल्याचे स्पष्ट केले आहे. या घोषणेसोबत वैदू जात पंचायतीने यापूर्वी घेतलेले निर्णय किंवा बहिष्कार रद्द झाले आहेत. (प्रतिनिधी)