शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

वैदू समाजाची जात पंचायतीला मूठमाती

By admin | Updated: March 16, 2015 10:36 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतींविरोधात उभारलेल्या लढ्याला रविवारी मोठे यश मिळाले. आधुनिक युगात जात पंचायत ही संकल्पना कालबाह्य व

अहमदनगर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतींविरोधात उभारलेल्या लढ्याला रविवारी मोठे यश मिळाले. आधुनिक युगात जात पंचायत ही संकल्पना कालबाह्य व कायद्याच्या विरुद्ध असल्याची स्पष्ट जाणीव झाल्याची कबुली देत वैदू समाजाने जात पंचायत बरखास्त करण्याची घोषणा श्रीरामपूर येथील बैठकीत केली.अखिल भारतीय वैदू समाजाचे नेते चंदर बापू दासरजोगी, श्यामलिंग मारुती शिंदे, मल्लू मारुती शिंदे तसेच ‘अंनिस’च्या जात पंचायत मूठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे, नगर जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे, आसिफ शेख यांच्या साक्षीने वैदू समाजाने हे ऐतिहासिक पाऊल उचलले. जात पंचायत कालबाह्य झाल्याचे पंचायतीनेच जाहीर केले. यापुढे समाजबांधवांनी प्रगती व विकास साधावा. शैक्षणिक व सामाजिक विकासाला प्राधान्य देत अनिष्ट रुढी परंपरांना फाटा द्यावा. समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. राज्य घटनेच्या चौकटीत राहून आचरण व विचारात बदल करावा. सामाजिक परिवर्तनाचे कार्य जोपासावे, असे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रबोधनामुळे जाणीव झाल्याचे बरखास्तीच्या घोषणापत्रात नमूद करून वैदू समाजाने परिवर्तनाच्या दिशेने नवे पाऊल टाकत असल्याचे स्पष्ट केले आहे. या घोषणेसोबत वैदू जात पंचायतीने यापूर्वी घेतलेले निर्णय किंवा बहिष्कार रद्द झाले आहेत. (प्रतिनिधी)