शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

बाबा आढाव यांचे उपोषण मागे

By admin | Updated: October 8, 2016 04:09 IST

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी सहाव्या दिवशी मागे घेतले.

पुणे : शेतमालाला हमीभाव व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी सहाव्या दिवशी मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांना तत्त्वत: मान्यता दिल्याचे गुरुवारी स्पष्ट केले होते. त्यानुसार डॉ. आढाव यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.डॉ. आढाव यांनी महात्मा गांधी जयंतीपासून उपोषणाला सुरुवात केली होती. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी दूरध्वनीवरून डॉ. आढाव यांच्याशी चर्चा केली. दोन्ही मागण्या तत्त्वत: मान्य असल्याचे त्यांना सांगण्यात आले. बापट यांचे तसे पत्रही डॉ. आढाव यांना देण्यात आले. त्यानुसार उपोषणावर निर्णय घेण्यास शुक्रवारी सकाळी सभा बोलाविण्यात आली होती. राज्य शासनातर्फे कृषी आयुक्त विकास देशमुख या वेळी उपस्थित होते. देशमुख यांनी दिलेले नारळपाणी पिऊन आढाव यांनी उपोषण सोडले. (प्रतिनिधी)>शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहे, असे मानतो. पण जर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवला तर आता जेवढे आयुष्य उरले आहे, तेवढे या चळवळीसाठी लढेन. तीन लाख शेतकरी आत्महत्या करतात तरी शासन हालत नाही. याविषयी घोषणा करण्याखेरीज उपाययोजना होत नाही ही शरमेची बाब आहे. - डॉ. बाबा आढाव