शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बाबासाहेबांचा ‘शाळा प्रवेश दिन’ जिल्हाभर!

By admin | Updated: November 6, 2014 22:57 IST

आज ११४ वर्षे पूर्ण : ज्ञानरूपी आकाशात भरारी घेण्याचं बळ दिलं होतं याच साताऱ्याच्या मातीनं..

प्रदीप यादव - सातारा -ज्ञानरूपी आकाशात आपल्या विलक्षण प्रतिभेचं तेजस्वी वलय निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय जीवनात पहिलं पाऊल टाकलं, ते सातारच्या शाळेत. तो दिवस म्हणजे ७ नोव्हेंबर. ज्ञानरूपी आकाशात भरारी मारण्याचं बळ त्यांना दिलं ते सातारच्याच मातीनं म्हणूनच या मातीला आणि या मातीतून घडलेल्या प्रज्ञावंताला वंदन करण्यासाठी गुरुवारी जिल्हाभर बाबासाहेबांचा ‘शाळा प्रवेश दिन’ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आपला देश कुठल्या जातिधर्मावर चालत नाही आणि नाही चालत कुठल्या धर्मग्रंथावर तो चालतो तो संविधानावर. असे हे समताधिष्ठित आणि जगातील सर्वांत मोठे संविधान ज्या प्रज्ञावंतानं लिहिलं त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा पाया घडला तो साताऱ्याच्या मातीत. याचा अभिमान बाळगून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनी केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळांमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तसेच संविधानाचे वाचन आणि बाबासाहेबांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आरंभ साताऱ्यातून झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी येथील राजवाडा सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूल) मध्ये त्यांनी इयत्ता पहिली इंग्रजी या वर्गात प्रवेश घेतला. हजेरीपुस्तकावर ‘भिवा’ असे त्यांचे नाव होते. चार वर्षे म्हणजे १९०० ते १९०४ या कालावधीत त्यांनी या शाळेत शिक्षण घेतले. याच शाळेत त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला. ज्या मातीनं बाबासाहेबांना घडविलं, ज्या मातीत प्रज्ञावंताच्या पावलांचे ठसे उमटले त्या मातीला वंदन करण्यासाठी दरवर्षी शाळा प्रवेशदिनी असंख्य लोक सातारच्या प्रतापसिंह महाराज हायस्कूलला भेट देतात. बाबासाहेबांचे शाळेत पाऊल पडलेच नसते तर जगाने गौरविलेले संविधान डॉ. आंबेडकरांच्या हातून जन्माला आले नसते. तसे झाले असते तर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात विषमता निर्माण झाली असती. मानवी मूूल्यांची हत्या झाली असती. वंचितांना आपल्या न्याय, हक्काची जाणीव कधीच झाली नसती. माणसाला माणूस म्हणून जगता आले नसते. म्हणूनच बाबासाहेबांचा शाळा प्रवेश हा युगांतराची चाहूल देणारी व इतिहासाला कूस बदलावयास लावणारी अशी क्रांतिकारी घटना आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक अरुण जावळे यांनी दिली. बाबासाहेबांची पहिली स्वाक्षरी शाळेच्या रजिस्टरला १९१४ या क्रमांकासमोर बाबासाहेबांची स्वाक्षरी आहे. इंग्रजीमध्ये केलेली ती स्वाक्षरी एखाद्या उच्चशिक्षिताला लाजवेल अशीच आहे. हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. म्हणूनच आजही शाळा प्रशासनाने तो जपून ठेवला आहे. फी भरून घेतला होता प्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत मागास असलेल्या समाजघटकांना आरक्षण दिले. सर्वच बाबतीत पिछाडीवर असलेला समाज मुख्य प्रवाहात यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. ज्यांनी इतरांच्या परिस्थितीचा विचार केला त्या बाबासाहेबांनी स्वत: मात्र पैसे भरूनच शाळेत प्रवेश घेतला होता. दहा वर्षांच्या प्रयत्नांना मिळाले यश भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या शैक्षणिक प्रवासाचा आरंभ साताऱ्याच्या मातीतून झाला, हे आपणा सर्वांचे अहोभाग्य आहे. अशा या महामानवाचा शाळा प्रवेश दिन जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत साजरा व्हावा आणि यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या हेतून अरुण जावळे हे दहा वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असून जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये हा सोहळा साजरा होत आहे.