शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नेते नाहीत - मोदी

By admin | Updated: October 11, 2015 20:08 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलितांचे नेते ठरवले तर हा त्यांचा अवमान आहे. आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलितांचे नेते ठरवले तर हा त्यांचा अवमान आहे. आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.  आंबेडकर नसते तर आज मोदीही नसते असे भावनिक विधानही त्यांनी केले आहे. 

मुंबईत इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक व मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजनानंतर बीकेसीतील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेतली. आज जगाला मार्टिन लूथरकिंग माहित आहेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जगाला माहित नाही हे आपलेच दुर्दैव आहे. बाबासाहेब अत्यंत कठीण स्थितीतून पुढे आले पण त्यांच्यात कटुता कधीही नव्हती असे मोदींनी सांगितले. कोणाला कधी भारतरत्न मिळाले हे सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही, ज्यांनी संविधान तयार केले अशा आंबेडकर यांचे तैलचित्र संसदेत लावण्यास तत्कालिन सरकार तयार नव्हते असे सूचक विधान करत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 

स्मारकात लोकसहभाग हवा 

इंदू मिलमधील आंबेडकर यांच्या स्मारकासाठी लोकसहभाग असायला हवा. महाराष्ट्रात ४० हजार गाव आहेत, या प्रत्येक गावाने स्मारकाच्या परिसरात एक रोपटं लावावे आणि ११ हजार रुपये द्यावे असे आवाहन मोदींनी केले आहे. यामुळे स्मारकाचे चित्रच बदलेल असे त्यांनी सांगितले. 

गडकरी, फडणवीस आणि प्रभूंचे कौतुक 

बीकेसीतील सभेत मोदींनी नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या तिघांचे भरभरुन कौतुक केले. बंदरांच्या विकासात गेल्या १० वर्षात सरकारने जे केले नाही ते गडकरींनी १५ महिन्यात करुन दाखवले. गडकरी हे वेगावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सध्या प्रतिदिन १५ किलोमीटरचे रस्ते तयार होतात असा दावा मोदींनी केला. तर मेट्रो प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याचे काम फडणवीस यांनी चार महिन्यांत पूर्ण केले. तसेच जलयुक्त शिवार योजनेसाठीही त्यांचे कौतुक केले पाहिजे असे मोदींनी नमूद केले. सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचे कामकाजही चांगले सुरु आहे असे सांगत मोदींनी प्रभूंचेही कौतुक केले. 

आमच्याविरोधात भीती पसरवणं बंद करा

देशात भाजपाची सत्ता आली की आरक्षणाविरोधात भीती पसरवली जाते. भाजपा आली म्हणजे आरक्षण जाणार अशी भीती समाजाला दाखवली जाते. ही खोटी माहिती पसरवून राजकारण करण्याचे उद्योग बंद झाले पाहिजे असे मोदींनी विरोधकांना सुनावले आहे.