शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नेते नाहीत - मोदी

By admin | Updated: October 11, 2015 20:08 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलितांचे नेते ठरवले तर हा त्यांचा अवमान आहे. आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ११ -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलितांचे नेते ठरवले तर हा त्यांचा अवमान आहे. आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.  आंबेडकर नसते तर आज मोदीही नसते असे भावनिक विधानही त्यांनी केले आहे. 

मुंबईत इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक व मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजनानंतर बीकेसीतील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेतली. आज जगाला मार्टिन लूथरकिंग माहित आहेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जगाला माहित नाही हे आपलेच दुर्दैव आहे. बाबासाहेब अत्यंत कठीण स्थितीतून पुढे आले पण त्यांच्यात कटुता कधीही नव्हती असे मोदींनी सांगितले. कोणाला कधी भारतरत्न मिळाले हे सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही, ज्यांनी संविधान तयार केले अशा आंबेडकर यांचे तैलचित्र संसदेत लावण्यास तत्कालिन सरकार तयार नव्हते असे सूचक विधान करत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. 

स्मारकात लोकसहभाग हवा 

इंदू मिलमधील आंबेडकर यांच्या स्मारकासाठी लोकसहभाग असायला हवा. महाराष्ट्रात ४० हजार गाव आहेत, या प्रत्येक गावाने स्मारकाच्या परिसरात एक रोपटं लावावे आणि ११ हजार रुपये द्यावे असे आवाहन मोदींनी केले आहे. यामुळे स्मारकाचे चित्रच बदलेल असे त्यांनी सांगितले. 

गडकरी, फडणवीस आणि प्रभूंचे कौतुक 

बीकेसीतील सभेत मोदींनी नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या तिघांचे भरभरुन कौतुक केले. बंदरांच्या विकासात गेल्या १० वर्षात सरकारने जे केले नाही ते गडकरींनी १५ महिन्यात करुन दाखवले. गडकरी हे वेगावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सध्या प्रतिदिन १५ किलोमीटरचे रस्ते तयार होतात असा दावा मोदींनी केला. तर मेट्रो प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याचे काम फडणवीस यांनी चार महिन्यांत पूर्ण केले. तसेच जलयुक्त शिवार योजनेसाठीही त्यांचे कौतुक केले पाहिजे असे मोदींनी नमूद केले. सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचे कामकाजही चांगले सुरु आहे असे सांगत मोदींनी प्रभूंचेही कौतुक केले. 

आमच्याविरोधात भीती पसरवणं बंद करा

देशात भाजपाची सत्ता आली की आरक्षणाविरोधात भीती पसरवली जाते. भाजपा आली म्हणजे आरक्षण जाणार अशी भीती समाजाला दाखवली जाते. ही खोटी माहिती पसरवून राजकारण करण्याचे उद्योग बंद झाले पाहिजे असे मोदींनी विरोधकांना सुनावले आहे.