शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आवाजी मतदानाचा पाचवा प्रयोग !

By admin | Updated: November 13, 2014 01:36 IST

भाजपाने बुधवारी आवाजी मतदानाने सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला, मात्र ही कृती लोकशाहीविरोधी आहे, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे,

अतुल कुलकर्णी ल्ल मुंबई
भाजपाने बुधवारी आवाजी मतदानाने सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला, मात्र ही कृती लोकशाहीविरोधी आहे, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे, काळा दिवस आहे, अशा शेलक्या शब्दांत सरकारवर टीका केली गेली; मात्र आवाजी मतदानाचा हा काही राज्यातला पहिलाच प्रयोग नाही. 1991 नंतरचा आवाजी मतदानाचा हा पाचवा प्रयोग आहे! याआधी चार वेळा हा ठराव बहुमताने संमत झाला. त्यात कोणतीही चर्चा झालेली नव्हती.
बुधवारी विधानसभेत काहीतरी भयंकर घडले, ऐतिहासिक घडले, असे चित्र रंगवले जात असले, तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. विशेष म्हणजे आवाजी मतदानाचा हा प्रयोग शिवसेनेनेच तब्बल तीन वेळा केला, तर काँग्रेसनेही एक वेळा हा प्रयोग विधानसभेत केला होता. 25 मार्च 1995 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारवर गजानन किर्तीकर, कासलीवाल, चंद्रकांत पडवळ, प्रभाकर मोरे, संजय बंड, राम आस्वले यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता व तो कोणतीही चर्चा न होता बहुमताने मंजूर झाला होता. त्यानंतर आठ महिन्यांनी पुन्हा एकदा 7 डिसेंबर 1995 रोजी मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव मंजूर केला गेला. तो रमेशचंद्र बंग, सीताराम घनदाट यांच्यासह आणखी तीन आमदारांनी आणला होता.
चार-साडेचार वर्षानंतर जोशी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले आणि नारायण राणो मुख्यमंत्री झाले. त्याही वेळी 17 फेब्रुवारी 1999 रोजी 12 आमदारांनी राणो यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव आणला. तो देखील कोणतीही चर्चा न होता बहुमताने मंजूर केला गेला. त्यानंतर युतीचे सरकार पायउतार झाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तेव्हा 23 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांच्या मंत्रिमंडळावर देखील सतीश चतुव्रेदी यांच्यासह पाच आमदारांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. तो सुद्धा चर्चा न होता बहुमताने मंजूर केला गेला.  
 
13 जून 2क्क्2 रोजी पुन्हा एकदा देशमुख सरकारवर असा विश्वास दर्शक ठराव आणला गेला. त्या वेळी तो मतास टाकला गेला आणि विलासरावांनी तो 143 विरुद्ध 133 मतांनी जिंकला. नंतर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळावरील ठराव 22 जानेवारी 2क्क्3 रोजी मतास टाकून मंजूर केला गेला. अगदी शेवटचा प्रस्ताव पुन्हा विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर आणण्यात आला तो 16 जुलै 2क्क्6 रोजी. तो देखील मतास टाकला गेला आणि तो 153 विरुद्ध क् मतांनी मंजूर झाला होता.