शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

औरंगाबाद: बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह पाझर तलावात आढळले

By admin | Updated: May 7, 2017 12:06 IST

जोगेश्वरी येथून शुक्रवारपासून घरातून गायब असलेल्या तीन शाळकरी मुलांचे प्रेत रांजगाण येथील पाझर तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद: जोगेश्वरी येथून शुक्रवारपासून घरातून गायब असलेल्या तीन शाळकरी मुलांचे प्रेत रांजगाण येथील पाझर तलावात
आढळल्याने खळबळ उडाली आहे.  पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर पाण्यात बुडून त्यांचा अंत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत बाहेर काढली. ही मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर बुडाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेत बाहेर काढली. राहुल सुभाष साबळे(१४), दीपक संजय अहिरे(१३) आणि प्रकाश विजय राजपूत(१३,सर्व रा.जोगेश्वरी,वाळूज महानगर)अशी मृत मुलांची नावे आहेत. प्राप्त माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली ही तिन्ही बालमित्र नंतर घरी परतली नव्हती. परिणामी त्यांच्या पालकांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात राहुल, दीपक आणि प्रकाश यांचे अज्ञातांनी अपहरण केल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांसह त्यांची पालक आणि नातेवाईक त्या बालकांचा युद्धपातळीवर शोध घेत असताना रविवारी सकाळी रांजणगाव शेणपुंजी येथील पाझर तलावात या मुलांचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळली. ही बाब परिसरातील नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाासह चिमुकल्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर तलावातून या चिमुकल्यांची प्रेत बाहेर काढण्यात आली. या मुलांचे प्रेत शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आली आहे. 
पोहोण्याचा मोह ?
शुक्रवारी दुपारी चार वाजता घराबाहेर पडल्यानंतर ही चिमुकले  फिरत फिरत रांजणगाव येथील तलावावर गेले असावे. तलावातील थंडगार पाणी पाहुन त्यांना पोहण्यासाठी उतरले असावे आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना जलसमाधी मिळाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस अधिका-यांनी व्यक्त केला.