शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

२७ हजार ग्रामपंचायतींचे आॅडिट २०१३पासून रखडले

By admin | Updated: July 21, 2015 01:00 IST

पुरेसे आॅडिटर नसल्याने राज्यातील तब्बल २७ हजार ग्रामपंचायतींच्या २०१३ नंतरच्या व्यवहारांचे आॅडिट रखडले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी आता सेवानिवृत्त

राजेश निस्ताने, यवतमाळपुरेसे आॅडिटर नसल्याने राज्यातील तब्बल २७ हजार ग्रामपंचायतींच्या २०१३ नंतरच्या व्यवहारांचे आॅडिट रखडले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी आता सेवानिवृत्त आॅडिटरची फौज दिमतीला दिली जाणार आहे. त्यासंंबंधीचे आदेश शुक्रवार जारी करण्यात आले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यवहाराचे आॅडिट स्थानिक निधी लेखा विभागामार्फत केले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगर परिषदा यांचे आॅडिट नियमित होते. मात्र ग्रामपंचायतींची संख्या मोठी असल्याने दरवर्षीच त्यांचे आॅडिट रखडते. राज्यात तब्बल २७ हजार ग्रामपंचायती आहेत. त्यांच्या आॅडिटची जबाबदारी स्थानिक निधी लेखा विभागाच्या केवळ एक हजार ४४ आॅडिटरवर आहे. ग्रामपंचायतींच्या तुलनेत एक टक्काही आॅडिटर उपलब्ध नसल्याने दरवर्षी आॅडिट प्रलंबित राहते.आजच्या घडीला विशेष मोहीम राबवूनही केवळ २०१३ पर्यंतचेच आॅडिट पूर्ण झाले आहे. पुढील दोन ते तीन वर्षांचे आॅडिट पूर्ण करण्याचे आव्हान आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये गैरव्यवहार असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. म्हणूनच ग्रामपंचायतींचे रखडलेले आॅडिट वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना वित्त खात्याने दिल्या आहेत. त्यासाठी लेखा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या लेखा परीक्षकांची सेवा घेण्याचे आदेश शुक्रवारी स्थानिक निधी लेखा संचालक एम. के. विधाते (मुंबई) यांनी जारी केल्याचे सूत्रांनी सांगितले.