शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

२७ हजार ग्रामपंचायतींचे आॅडिट २०१३पासून रखडले

By admin | Updated: July 21, 2015 01:00 IST

पुरेसे आॅडिटर नसल्याने राज्यातील तब्बल २७ हजार ग्रामपंचायतींच्या २०१३ नंतरच्या व्यवहारांचे आॅडिट रखडले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी आता सेवानिवृत्त

राजेश निस्ताने, यवतमाळपुरेसे आॅडिटर नसल्याने राज्यातील तब्बल २७ हजार ग्रामपंचायतींच्या २०१३ नंतरच्या व्यवहारांचे आॅडिट रखडले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी आता सेवानिवृत्त आॅडिटरची फौज दिमतीला दिली जाणार आहे. त्यासंंबंधीचे आदेश शुक्रवार जारी करण्यात आले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यवहाराचे आॅडिट स्थानिक निधी लेखा विभागामार्फत केले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगर परिषदा यांचे आॅडिट नियमित होते. मात्र ग्रामपंचायतींची संख्या मोठी असल्याने दरवर्षीच त्यांचे आॅडिट रखडते. राज्यात तब्बल २७ हजार ग्रामपंचायती आहेत. त्यांच्या आॅडिटची जबाबदारी स्थानिक निधी लेखा विभागाच्या केवळ एक हजार ४४ आॅडिटरवर आहे. ग्रामपंचायतींच्या तुलनेत एक टक्काही आॅडिटर उपलब्ध नसल्याने दरवर्षी आॅडिट प्रलंबित राहते.आजच्या घडीला विशेष मोहीम राबवूनही केवळ २०१३ पर्यंतचेच आॅडिट पूर्ण झाले आहे. पुढील दोन ते तीन वर्षांचे आॅडिट पूर्ण करण्याचे आव्हान आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये गैरव्यवहार असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. म्हणूनच ग्रामपंचायतींचे रखडलेले आॅडिट वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना वित्त खात्याने दिल्या आहेत. त्यासाठी लेखा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या लेखा परीक्षकांची सेवा घेण्याचे आदेश शुक्रवारी स्थानिक निधी लेखा संचालक एम. के. विधाते (मुंबई) यांनी जारी केल्याचे सूत्रांनी सांगितले.