शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

२७ हजार ग्रामपंचायतींचे आॅडिट २०१३पासून रखडले

By admin | Updated: July 21, 2015 01:00 IST

पुरेसे आॅडिटर नसल्याने राज्यातील तब्बल २७ हजार ग्रामपंचायतींच्या २०१३ नंतरच्या व्यवहारांचे आॅडिट रखडले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी आता सेवानिवृत्त

राजेश निस्ताने, यवतमाळपुरेसे आॅडिटर नसल्याने राज्यातील तब्बल २७ हजार ग्रामपंचायतींच्या २०१३ नंतरच्या व्यवहारांचे आॅडिट रखडले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी आता सेवानिवृत्त आॅडिटरची फौज दिमतीला दिली जाणार आहे. त्यासंंबंधीचे आदेश शुक्रवार जारी करण्यात आले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यवहाराचे आॅडिट स्थानिक निधी लेखा विभागामार्फत केले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगर परिषदा यांचे आॅडिट नियमित होते. मात्र ग्रामपंचायतींची संख्या मोठी असल्याने दरवर्षीच त्यांचे आॅडिट रखडते. राज्यात तब्बल २७ हजार ग्रामपंचायती आहेत. त्यांच्या आॅडिटची जबाबदारी स्थानिक निधी लेखा विभागाच्या केवळ एक हजार ४४ आॅडिटरवर आहे. ग्रामपंचायतींच्या तुलनेत एक टक्काही आॅडिटर उपलब्ध नसल्याने दरवर्षी आॅडिट प्रलंबित राहते.आजच्या घडीला विशेष मोहीम राबवूनही केवळ २०१३ पर्यंतचेच आॅडिट पूर्ण झाले आहे. पुढील दोन ते तीन वर्षांचे आॅडिट पूर्ण करण्याचे आव्हान आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये गैरव्यवहार असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. म्हणूनच ग्रामपंचायतींचे रखडलेले आॅडिट वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना वित्त खात्याने दिल्या आहेत. त्यासाठी लेखा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या लेखा परीक्षकांची सेवा घेण्याचे आदेश शुक्रवारी स्थानिक निधी लेखा संचालक एम. के. विधाते (मुंबई) यांनी जारी केल्याचे सूत्रांनी सांगितले.