पुणो : गणोश विसर्जनासाठी वापर केल्या जाणा:या जिल्ह्यातील खाणींवर सातव्या (दि.4) व शेवटच्या दिवशी (दि.8) विशेष दक्षता घेण्याची सूचना महापालिका व तलाठी यांना देण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली. नागरिकांनी महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या हौदातच गणोश विसर्जन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गणोश विसर्जनासाठी गेलेल्या चार जणांचा मांगडेवाडी येथील दगडखाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. जिल्ह्यातही तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. महापालिका हद्दीतील ज्या दगडखाणींमध्ये गणोश विसर्जन करण्यात येते तेथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातही विसजर्न घाटांवर दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची सूचना सर्व तहसिलदारांना देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
विसजर्न घाटांवर पोलिसांचा बंदोबस्त
पुणो : गणोश विसजर्नादरम्यान दोन महिला आणि मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील तसेच जिल्ह्यातील विसजर्न घाटांवर आवश्यक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस ठाण्यांना देण्याता आल्या आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी मनपाशी समन्वय साधून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली.
पावसामुळे पुणो परिसरातील भरलेल्या आहेत. गणोश मुत्र्याचे विसजर्न करण्यासाठी सध्या या खाणींवर गर्दी होते. या खाणींवर जिवरक्षक व पोलीस नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंगळवारी कात्रज येथील मांगडेवाडीतील दुर्घटना याचीच परीणिती आहे. त्यामुळे शहरातील कालवे, खाणी, नदी पात्र व तलाव अशा संभाव्य विसजर्न घाटांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना तातडीने देण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांनी याठिकाणी बंदोबस्त ठेवून यंत्रणा कुचकामी ठरणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे बुधवारपासूनच पोलिसांच्या बंदोबस्ताला सुरुवात झाली आहे. पुणो व पिंपरी चिंचवड महापालिका, अग्निशामक दलासोबत पोलीस समन्वय साधून विसजर्न घाटावर पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करतील. (प्रतिनिधी)
राजगुरुनगरचा विसर्जन घाट धोकादायक
राजगुरुनगर : नदीत उतरण्याची जोखीम नको आणि त्यात राजगुरुनगरचा गणपती विसर्जन घाट धोकादायक झाल्याने घरातले गणपती बुडवायला पांढरपेशा समाजातील लोक कातकरी समाजातील मुलांना मूर्ती देऊन नदीत उतरवतात. त्यासाठी त्या मुलांना पैसेही देतात. या मुलांना कधीतरीच रोख रक्कम पाहायला मिळत असल्याने ती आनंदाने हे काम करतात. सोबत प्रसाद आणि काहीबाही वस्तूही मिळत असल्याने हि कातकरी मुले खुश असतात. आयुष्यच नदीकाठावर वाहते त्यामुळे पाण्याची भीती त्यांच्या गावीही नसते. शेजारच्या चांडोली गावात नदीकिनारी राहणरी हि मुले गणपतीच्या दिवसात येथे ठाण मांडून बसतात. कारण दीड, तीन, पाच, सात अशा दिवसांचे घरगुती गणपती लोक येथे बुडवायला येतात. आपण उत्सव आवड, परंपरा आणि पुण्यकर्म म्हणून साजरे करतो. पण आपला जीव प्यारा असतो म्हणून हि जबाबदारी त्या लहानग्यांवर टाकतो. भारतीय विषमतेचे भीषण वास्तवच या निमित्ताने पहावयास मिळते .