शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

गारपीटग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: June 8, 2014 02:04 IST

अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे आणि मदत वितरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप करत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी शनिवारी सरकारला धारेवर धरले.

गारपीटग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारवर हल्लाबोलदोन्ही बाजूंच्या सदस्यांनी केले भ्रष्टाचाराचे आरोप१५ हजार कोटींचे पॅकेज, पिककर्ज माफीची विनोद तावडेंची मागणी मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे आणि मदत वितरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप करत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी शनिवारी सरकारला धारेवर धरले. दरम्यान, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बाधित शेतकर्‍यांना संपूर्ण पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली. राज्यातील अवेळी पाऊस आणि गारपिटीच्या संदर्भात सत्ताधारी सदस्यांनी विधान परिषद नियम २६० अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करुन येत्या १५ दिवसांत अहवाल मागवण्याच्या सूचना कराव्यात असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही पंडित यांनी केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला. राज्य सरकारमधील मंत्रीही टक्केवारी घेतात. हीच पद्धत आता ग्रामीण स्तरावरही सुरु झाली आहे, असा आरोप तावडे यांनी केला. यावर राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी पुराव्याशिवाय आरोप करणे गैर असल्याचे म्हणत सत्ताधार्‍यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तावडे पुढे म्हणाले, केंद्रीय हवामान खात्याने गारपीटीची स्पष्ट सूचना राज्याच्या आपत्ती निवारण विभागाला दिली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. राज्य सरकारच्या बेपर्वाइमुळेच गारपीटग्रस्त शेतकरी अडचणीत आला आणि त्यांनी मृत्युला जवळ केले. या आत्महत्यांना राज्य सरकारच जबाबदार असून संबंधित विभागाचे अधिकारी व मंत्र्यांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी तावडे यांनी केली. यावेळी राज्य सरकारने गारपीटग्रस्तांसाठी १५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करावे अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेचे रामदास कदम, डॉ.अपूर्व हिरे, राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)