शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: June 8, 2014 02:04 IST

अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे आणि मदत वितरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप करत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी शनिवारी सरकारला धारेवर धरले.

गारपीटग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारवर हल्लाबोलदोन्ही बाजूंच्या सदस्यांनी केले भ्रष्टाचाराचे आरोप१५ हजार कोटींचे पॅकेज, पिककर्ज माफीची विनोद तावडेंची मागणी मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे आणि मदत वितरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप करत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी शनिवारी सरकारला धारेवर धरले. दरम्यान, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बाधित शेतकर्‍यांना संपूर्ण पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली. राज्यातील अवेळी पाऊस आणि गारपिटीच्या संदर्भात सत्ताधारी सदस्यांनी विधान परिषद नियम २६० अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करुन येत्या १५ दिवसांत अहवाल मागवण्याच्या सूचना कराव्यात असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही पंडित यांनी केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला. राज्य सरकारमधील मंत्रीही टक्केवारी घेतात. हीच पद्धत आता ग्रामीण स्तरावरही सुरु झाली आहे, असा आरोप तावडे यांनी केला. यावर राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी पुराव्याशिवाय आरोप करणे गैर असल्याचे म्हणत सत्ताधार्‍यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तावडे पुढे म्हणाले, केंद्रीय हवामान खात्याने गारपीटीची स्पष्ट सूचना राज्याच्या आपत्ती निवारण विभागाला दिली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. राज्य सरकारच्या बेपर्वाइमुळेच गारपीटग्रस्त शेतकरी अडचणीत आला आणि त्यांनी मृत्युला जवळ केले. या आत्महत्यांना राज्य सरकारच जबाबदार असून संबंधित विभागाचे अधिकारी व मंत्र्यांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी तावडे यांनी केली. यावेळी राज्य सरकारने गारपीटग्रस्तांसाठी १५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करावे अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेचे रामदास कदम, डॉ.अपूर्व हिरे, राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)