शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

गारपीटग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: June 8, 2014 02:04 IST

अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे आणि मदत वितरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप करत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी शनिवारी सरकारला धारेवर धरले.

गारपीटग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारवर हल्लाबोलदोन्ही बाजूंच्या सदस्यांनी केले भ्रष्टाचाराचे आरोप१५ हजार कोटींचे पॅकेज, पिककर्ज माफीची विनोद तावडेंची मागणी मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे आणि मदत वितरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप करत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी शनिवारी सरकारला धारेवर धरले. दरम्यान, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बाधित शेतकर्‍यांना संपूर्ण पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली. राज्यातील अवेळी पाऊस आणि गारपिटीच्या संदर्भात सत्ताधारी सदस्यांनी विधान परिषद नियम २६० अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करुन येत्या १५ दिवसांत अहवाल मागवण्याच्या सूचना कराव्यात असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही पंडित यांनी केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला. राज्य सरकारमधील मंत्रीही टक्केवारी घेतात. हीच पद्धत आता ग्रामीण स्तरावरही सुरु झाली आहे, असा आरोप तावडे यांनी केला. यावर राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी पुराव्याशिवाय आरोप करणे गैर असल्याचे म्हणत सत्ताधार्‍यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तावडे पुढे म्हणाले, केंद्रीय हवामान खात्याने गारपीटीची स्पष्ट सूचना राज्याच्या आपत्ती निवारण विभागाला दिली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. राज्य सरकारच्या बेपर्वाइमुळेच गारपीटग्रस्त शेतकरी अडचणीत आला आणि त्यांनी मृत्युला जवळ केले. या आत्महत्यांना राज्य सरकारच जबाबदार असून संबंधित विभागाचे अधिकारी व मंत्र्यांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी तावडे यांनी केली. यावेळी राज्य सरकारने गारपीटग्रस्तांसाठी १५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करावे अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेचे रामदास कदम, डॉ.अपूर्व हिरे, राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)