शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही - आठवले

By admin | Updated: September 11, 2016 03:56 IST

कोपर्डीची घटना आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा यांचा दूरपर्यंत काही संबध नाही. या घटनेच्या नावाखाली मोर्चे काढून कायदा रद्द करण्याची मागणी केली जात आहे

पुणे : कोपर्डीची घटना आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा यांचा दूरपर्यंत काही संबध नाही. या घटनेच्या नावाखाली मोर्चे काढून कायदा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, कितीही मोर्चे काढले तरी संसदेने दलितांना संरक्षण देण्यासाठी तयार केलेला हा कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द केला जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. कायद्याचा गैरवापर होत असल्याचे काही जण वांरवार सांगत आहेत. अशा घटना घडत असतील तर त्यांनी त्या दाखवून द्याव्यात आपण स्वत: कायद्यात बदल करण्यासाठी पुढाकार घेऊ, असे ते म्हणाले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चर्चेत ते बोलत होते. आठवले म्हणाले , ‘कोपर्डी घटनेतील आरोपी दलित आहेत. या घटनेनंतर रिपाईच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना पोलिसांसमोर हजर केले. त्यामुळे याला जातीय राजकरणाचा रंग देणे योग्य नाही. राज्यात मराठा आणि दलित एकत्रित आल्यास मोठी ताकद उभी राहणार आहे.’ (प्रतिनिधी)