शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

पनवेलमधील एटीएम पुन्हा एकदा बंद

By admin | Updated: April 6, 2017 02:32 IST

नोटाबंदीनंतर सरकारने बँकेत पैसे भरणे, तसेच काढण्यासाठी निर्बंध लादले होते.

पनवेल : नोटाबंदीनंतर सरकारने बँकेत पैसे भरणे, तसेच काढण्यासाठी निर्बंध लादले होते. या कालावधीत देशात सर्वच बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या. त्यानंतर परिस्थिती काही दिवसांनंतर सुरळीत झाली होती. ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस होता. यानंतर लागोपाठ सुट्यांनंतर अनेक बँकांच्या एटीएमला रिझर्व्ह बँकेच्या वतीने पैशांचा पुरवठा झाला नसल्याने पुन्हा एकदा अनेक एटीएम बंद होते. तसेच आपल्या परिसरातील एटीएममध्ये पैसे नसल्याने संपूर्ण शहराच्या खेट्या माराव्या लागत आहेत. पनवेलमधील नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे या शहरांत ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. रिझर्व्ह बँकेतून एटीएमना पैशांचा पुरवठा होत नसल्याने ही समस्या उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ही समस्या पनवेलमधील विविध भागांत भेडसावत आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरु वातीमुळे १ एप्रिल रोजी बँकांचे कामकाज बंद होते. त्यानंतर २ मार्च रविवारी आणि ३ मार्चला सोमवारी बँकांचे कामकाज सुरू होते. मात्र, मंगळवारी ४ मार्चला रामनवमीची सुट्टी असल्याने बँका बंदच होत्या. दरम्यान, या सुटीच्या कालावधीत सर्वच एटीएम रिकामी झाले. पनवेल तालुक्यात विविध बँकांचे जवळ जवळ ३००पेक्षा जास्त एटीएम आहेत. मात्र, यामधील निम्म्या एटीएममध्ये दोन दिवसांत पैशांचा पुरवठा झाला नसल्याने नागरिकांची नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा तारांबळ उडाली. (प्रतिनिधी)कामोठे येथील केतन शिरोडकर म्हणाले की, शहरात १० पेक्षा जास्त एटीएम फिरलो, तरीसुद्धा बरेचशी एटीएम बंदच होती. अशाप्रकारची परिस्थिती उद्भवल्याची कोणाला माहिती नसल्याने मीदेखील संभ्रमात होतो. बुधवार, ५ मार्चपासून एटीएममधील ही परिस्थिती काही प्रमाणात पूर्ववत झाली. यासंदर्भात नवीन पनवेलमधील एका बँकेच्या व्यवस्थापनाने नाव न छापण्याच्या अटींवर माहिती देताना सांगितले की, बँक ांना व्यवस्थित पैशांचा पुरवठा झाला आहे. मात्र, रिझर्व्ह बॅँकेद्वारे एटीएममध्ये पैसे पुरविणाऱ्या एजन्सीला पैसे वेळेवर पुरविले नसल्याने ही समस्या उद्भवल्याचे सांगितले.