शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

एटीएम सेवाही महागणार?

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

ग्राहकांना धक्का : यापुढे महिन्याला केवळ तीनच व्यवहार

रत्नागिरी : एटीएम सुविधा ग्राहकांसाठी बँकांनी जारी केली. ग्राहकांना त्यामुळे केव्हाही व कधीही पैसे काढता येत होते. परंतु बँकांनी त्यावर निर्बध आणले होते. मासिक पाचव्या व्यवहारानंतर पुढील व्यवहारासाठी पैसे आकारले जात असत. परंतु, आता तर पहिले तीन व्यवहारच मोफत होणार असून पुढील व्यवहारासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत.रिझर्व्ह बँकेने आॅगस्ट २०१४ मध्ये हे एटीएम व्यवहारावर निर्बंध आणणारे परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार दि. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. पहिले तीन व्यवहार मोफत असा आदेश असला तरी व्यवहार म्हणजे फक्त पैसे काढणेच नव्हे. एटीएममध्ये जावून तुम्ही मिनी स्टेटमेंट वा बॅलन्स इन्क्वायरी केलीत तरी तो ‘व्यवहारच’ समजला जाईल. त्यामुळे तीनवेळा एटीएममध्ये गेल्यानंतर पुढील प्रत्येक व्यवहारासाठी २० रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. काही बँकानी त्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्याचे ठरविणार आले आहे. त्यानुसार ग्राहकांना एसएमएस पाठविण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वी बँक ग्राहकांना अमर्यादित व्यवहार करता येत होते. मात्र हळूहळू या व्यवहारावर निर्बंध आणण्यात येत आहे. परिणामी आता एटीएमच्या प्रेमात पडलेल्या ग्राहकांसाठी हे प्रेम भुर्दंड पाडणारे ठरणार आहे. (प्रतिनिधी)