शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

सहायक आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: March 7, 2017 03:11 IST

सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला

उल्हासनगर : अतिक्रमण तोडताना दुकानाचा भाग अर्धवट तोडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी ही दुर्घटना घडली होती. त्यात बळी गेल्याच्या मुद्द्यावरून सतर्क नागरिकांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकायुक्ताकडे केली होती.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर महापालिकेने अंबरनाथ- कल्याण महामार्ग १०० फुटी करण्यासाठी अतिक्रमणे तोडून त्याचे रुंदीकरण केले. शिवाजी चौकाजवळील टिल्सन मार्केट येथील दुकानावर प्रभाग अधिकारी व सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई केली. त्यातील अर्धवट तोडलेल्या दुकानाचा धोकादायक भाग कोसळून दुर्घटना घडू शकते, असे शेजारच्या दुकानदारासह नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना सुचवले होते. पण, त्या अर्धवट तोडलेल्या बांधकामाचा भाग तोडण्यात आला नाही. १९ जुलैला रवींद्र पाल (वय ४०) स्कूटरवरून या अर्धवट तुटलेल्या दुकानाखालून जात असताना अचानक धोकादायक भाग त्यांच्या अंगावर कोसळला आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पालिकेवर टीकेची झोड उठली. धोका लक्षात आणून दिल्यानंतरही तोडलेले बांधकाम अर्धवट स्थितीत ठेवल्याबद्दल आणि त्यामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत महापालिकेचे सहायक आयुक्त गोवारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पाल यांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकायुक्तांकडे करण्यात आली. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार न धरता फक्त गोवारी आणि शासकीय कर्मचारी दीपक रोहिदास भोई यांच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतरही खऱ्या गुन्हेगारांना वाचवल्याबद्दल पालिकेवर टीका सुरू आहे. रस्ता रुंदीकरणात आपले हक्काचे दुकान जाते, म्हणून काही दुकानदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. (प्रतिनिधी)>शहाड - पालिका रस्त्याचे कामही वादग्रस्तया मृत्यू प्रकरणाने अंबरनाथ-कल्याण रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महापालिकेने चूक सुधारण्यासाठी पाल यांच्या कुटुंबाला नुकसानभरपाई दिली आहे. त्यानंतरही रस्त्याच्या बाजूला असलेली अर्धवट तुटलेली दुकाने जमीनदोस्त करण्याची मागणी होत आहे. पालिकेचे सहायक आयुक्त गोवारी यांच्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी त्याच प्रमाणात दोषी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी याचिकाकर्ते पुन्हा लोकायुक्तांचा दरवाजा ठोठावणार आहेत. अंबरनाथ-कल्याण रस्त्याप्रमाणे शहाड स्टेशन ते महापालिका रस्त्याचे कामही वादग्रस्त ठरले. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सहा जणांचा बळी गेल्याचा आरोप महासभेत झाला होता. त्यांच्या कुटुंंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी मध्यंतरी झाली आहे. आजही काही दुकाने रस्त्याच्या बाजूला अर्धवट तुटलेल्या स्थितीत असून त्याबाबत काहीच निर्णय लागत नसल्याने दीड वर्षापासून अंबरनाथ-कल्याण रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.