शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: March 7, 2017 03:11 IST

सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला

उल्हासनगर : अतिक्रमण तोडताना दुकानाचा भाग अर्धवट तोडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी ही दुर्घटना घडली होती. त्यात बळी गेल्याच्या मुद्द्यावरून सतर्क नागरिकांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकायुक्ताकडे केली होती.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर महापालिकेने अंबरनाथ- कल्याण महामार्ग १०० फुटी करण्यासाठी अतिक्रमणे तोडून त्याचे रुंदीकरण केले. शिवाजी चौकाजवळील टिल्सन मार्केट येथील दुकानावर प्रभाग अधिकारी व सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई केली. त्यातील अर्धवट तोडलेल्या दुकानाचा धोकादायक भाग कोसळून दुर्घटना घडू शकते, असे शेजारच्या दुकानदारासह नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना सुचवले होते. पण, त्या अर्धवट तोडलेल्या बांधकामाचा भाग तोडण्यात आला नाही. १९ जुलैला रवींद्र पाल (वय ४०) स्कूटरवरून या अर्धवट तुटलेल्या दुकानाखालून जात असताना अचानक धोकादायक भाग त्यांच्या अंगावर कोसळला आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पालिकेवर टीकेची झोड उठली. धोका लक्षात आणून दिल्यानंतरही तोडलेले बांधकाम अर्धवट स्थितीत ठेवल्याबद्दल आणि त्यामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत महापालिकेचे सहायक आयुक्त गोवारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पाल यांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकायुक्तांकडे करण्यात आली. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार न धरता फक्त गोवारी आणि शासकीय कर्मचारी दीपक रोहिदास भोई यांच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतरही खऱ्या गुन्हेगारांना वाचवल्याबद्दल पालिकेवर टीका सुरू आहे. रस्ता रुंदीकरणात आपले हक्काचे दुकान जाते, म्हणून काही दुकानदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. (प्रतिनिधी)>शहाड - पालिका रस्त्याचे कामही वादग्रस्तया मृत्यू प्रकरणाने अंबरनाथ-कल्याण रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. महापालिकेने चूक सुधारण्यासाठी पाल यांच्या कुटुंबाला नुकसानभरपाई दिली आहे. त्यानंतरही रस्त्याच्या बाजूला असलेली अर्धवट तुटलेली दुकाने जमीनदोस्त करण्याची मागणी होत आहे. पालिकेचे सहायक आयुक्त गोवारी यांच्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी त्याच प्रमाणात दोषी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी याचिकाकर्ते पुन्हा लोकायुक्तांचा दरवाजा ठोठावणार आहेत. अंबरनाथ-कल्याण रस्त्याप्रमाणे शहाड स्टेशन ते महापालिका रस्त्याचे कामही वादग्रस्त ठरले. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सहा जणांचा बळी गेल्याचा आरोप महासभेत झाला होता. त्यांच्या कुटुंंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी मध्यंतरी झाली आहे. आजही काही दुकाने रस्त्याच्या बाजूला अर्धवट तुटलेल्या स्थितीत असून त्याबाबत काहीच निर्णय लागत नसल्याने दीड वर्षापासून अंबरनाथ-कल्याण रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.