शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

मालमत्तेची माहिती आता मिळणार ‘एसएमएस’वर!

By admin | Updated: May 24, 2016 03:46 IST

जमिनींसह सदनिकांचे वाढते गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्यशासनाचा नोंदणी व मुद्रांक विभाग पुढे सरसावला आहे. खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात आले असून ते थेट मोबाईलशी

पुणे : जमिनींसह सदनिकांचे वाढते गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्यशासनाचा नोंदणी व मुद्रांक विभाग पुढे सरसावला आहे. खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात आले असून ते थेट मोबाईलशी जोडले आहे. त्यामुळे ज्या मालमत्तेची खरेदी-विक्री करणार त्याच्या कागदपत्रांवरील नोंदणी क्रमांक विभागाच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस केल्यास ती जमीन कोणाच्या नावावर आहे, त्या कागदपत्राची नोंद कधी झाली आहे, याची माहिती लगेचच संबंधिताला मिळणार आहे. यामुळे गैरव्यवहारांना आळा बसण्यास मोठी मदत होईल.राज्यात जमिनींसह सदनिकांच्या गैरव्यवहारात मोठी वाढ झाली आहे. मालमत्तेची खरेदी-विक्री करणारे दलाल अनेकदा बनावट कागदपत्रे दाखवितात. परंतु ते तपासण्याची सोपी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने त्याचा फटका खरेदीदारांना बसत होता. बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेऊन मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना पुढे ती मालमत्ता अनेकांना विकल्याचे निदर्शनास येते. मात्र त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. नोंदणी व मुद्रांक विभागाने जमिनी, सदनिकांच्या विक्रीच्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यास सुरूवात केली आणि ते सर्व्हरवर ठेवून विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन देण्यास सुरूवात केली. ‘ई सर्च’च्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या व्यक्तीला तो जी मालमत्ता घेणार आहे ती नेमकी कोणाच्या नावावर आहे हे त्या मालमत्तेचा नोंदणी क्रमांक टाकून समजू लागले. आता एसएमएसवर देखील माहिती दिली जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने या सेवेसाठी ९७६६८९९८९९ हा क्रमांक दिला आहे.वाढलेले मालमत्तेचे गैरव्यवहार रोखण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाने एसएमएस सेवा सुरू केली आहे. विभागाच्या संकेतस्थळावर कागदपत्रे आहेत. मात्र आता त्याची माहिती एसएमएसवरुनही मिळणारआहे. खरेदीदाराने कागदपत्रांवरील नोंदणी क्रमांक विभागाने दिलेल्या (९७६६८९९८९९) क्रमांकावर एसएमएस केल्यावर त्यांना लगेचच ती मालमत्ता कोणाच्या नावे आहे हे कळणार आहे.- एन. रामास्वामी, महानिरीक्षक-नोंदणी व मुद्रांक विभाग