शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

मोदी सरकारची दोन वर्षे अपेक्षाभंगाची आणि फसवणुकीची- अशोक चव्हाण

By admin | Updated: May 25, 2016 21:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारेमाप घोषणाबाजी केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारेमाप घोषणाबाजी केली. जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखवली. पण दोन वर्षात या सरकारने घोर निराशा केली असून, जनतेच्या मनात फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे, अशी सडकून टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज केली.मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, अब की बार मोदी सरकारचा नारा देत भाजप सत्तेत आली. पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना त्याकडे लक्ष देण्यास मोदींना वेळ नाही. पंतप्रधान मराठवाड्याला साधी भेटही देऊ शकलेले नाहीत. 2015 या एका वर्षात महाराष्ट्रात 3228 शेतक-यांनी आत्महत्या केल्या. पण त्याची दखलही या सरकारने घेतलेली दिसत नाही. शेतक-यांना कर्जमाफी देणे तर दूरच राहिले पण त्यांना योग्य ती आर्थिक मदत देण्यातही सरकारने हात आखडता घेतला.शेतकरी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक अशा कोणत्याही घटकाला मोदी सरकार न्याय देऊ शकले नाही. लव्ह जिहाद, घरवापसी, बीफ बॅन, भारत माता की जय, असे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम या सरकारने दोन वर्षात केले, असा आरोपही त्यांनी केला. महागाई कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पण दोन वर्षात महागाई कमी तर झाली नाहीच पण सामान्य लोकांचे जगणे मात्र महाग झाले, असे टीकास्त्र अशोक चव्हाण यांनी सोडले. 77 रुपये किलोने मिळणारी तूर दाळ 200 रुपये किलो झाली, पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीचे घसरले पण भारतात मात्र हे दर त्याप्रमाणात कमी झाले नाहीत. काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासनही हवेतच विरले आहे. अजूनही लोक 15 लाख रुपये आपल्या खात्यात कधी जमा होतात, याची वाट पाहत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.मोदी सरकार सर्वसामान्य जनता, शेतकरी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे नसून ते फक्त मूठभर धनदांडग्यांचे सरकार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. मोदी सत्तेत आल्यानंतर देशातील सर्व घटकांचे अच्छे दिन संपल्याचे दिसत आहे. लोकांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष 26 ते 31 मे दरम्यान आंदोलन करणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.