शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

मोदी सरकारची दोन वर्षे अपेक्षाभंगाची आणि फसवणुकीची- अशोक चव्हाण

By admin | Updated: May 25, 2016 21:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारेमाप घोषणाबाजी केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारेमाप घोषणाबाजी केली. जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखवली. पण दोन वर्षात या सरकारने घोर निराशा केली असून, जनतेच्या मनात फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे, अशी सडकून टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज केली.मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, अब की बार मोदी सरकारचा नारा देत भाजप सत्तेत आली. पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना त्याकडे लक्ष देण्यास मोदींना वेळ नाही. पंतप्रधान मराठवाड्याला साधी भेटही देऊ शकलेले नाहीत. 2015 या एका वर्षात महाराष्ट्रात 3228 शेतक-यांनी आत्महत्या केल्या. पण त्याची दखलही या सरकारने घेतलेली दिसत नाही. शेतक-यांना कर्जमाफी देणे तर दूरच राहिले पण त्यांना योग्य ती आर्थिक मदत देण्यातही सरकारने हात आखडता घेतला.शेतकरी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक अशा कोणत्याही घटकाला मोदी सरकार न्याय देऊ शकले नाही. लव्ह जिहाद, घरवापसी, बीफ बॅन, भारत माता की जय, असे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम या सरकारने दोन वर्षात केले, असा आरोपही त्यांनी केला. महागाई कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पण दोन वर्षात महागाई कमी तर झाली नाहीच पण सामान्य लोकांचे जगणे मात्र महाग झाले, असे टीकास्त्र अशोक चव्हाण यांनी सोडले. 77 रुपये किलोने मिळणारी तूर दाळ 200 रुपये किलो झाली, पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीचे घसरले पण भारतात मात्र हे दर त्याप्रमाणात कमी झाले नाहीत. काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासनही हवेतच विरले आहे. अजूनही लोक 15 लाख रुपये आपल्या खात्यात कधी जमा होतात, याची वाट पाहत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.मोदी सरकार सर्वसामान्य जनता, शेतकरी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे नसून ते फक्त मूठभर धनदांडग्यांचे सरकार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. मोदी सत्तेत आल्यानंतर देशातील सर्व घटकांचे अच्छे दिन संपल्याचे दिसत आहे. लोकांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष 26 ते 31 मे दरम्यान आंदोलन करणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.