शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

मोदी सरकारची दोन वर्षे अपेक्षाभंगाची आणि फसवणुकीची- अशोक चव्हाण

By admin | Updated: May 25, 2016 21:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारेमाप घोषणाबाजी केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारेमाप घोषणाबाजी केली. जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखवली. पण दोन वर्षात या सरकारने घोर निराशा केली असून, जनतेच्या मनात फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे, अशी सडकून टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज केली.मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, अब की बार मोदी सरकारचा नारा देत भाजप सत्तेत आली. पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना त्याकडे लक्ष देण्यास मोदींना वेळ नाही. पंतप्रधान मराठवाड्याला साधी भेटही देऊ शकलेले नाहीत. 2015 या एका वर्षात महाराष्ट्रात 3228 शेतक-यांनी आत्महत्या केल्या. पण त्याची दखलही या सरकारने घेतलेली दिसत नाही. शेतक-यांना कर्जमाफी देणे तर दूरच राहिले पण त्यांना योग्य ती आर्थिक मदत देण्यातही सरकारने हात आखडता घेतला.शेतकरी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक अशा कोणत्याही घटकाला मोदी सरकार न्याय देऊ शकले नाही. लव्ह जिहाद, घरवापसी, बीफ बॅन, भारत माता की जय, असे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम या सरकारने दोन वर्षात केले, असा आरोपही त्यांनी केला. महागाई कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पण दोन वर्षात महागाई कमी तर झाली नाहीच पण सामान्य लोकांचे जगणे मात्र महाग झाले, असे टीकास्त्र अशोक चव्हाण यांनी सोडले. 77 रुपये किलोने मिळणारी तूर दाळ 200 रुपये किलो झाली, पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमालीचे घसरले पण भारतात मात्र हे दर त्याप्रमाणात कमी झाले नाहीत. काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासनही हवेतच विरले आहे. अजूनही लोक 15 लाख रुपये आपल्या खात्यात कधी जमा होतात, याची वाट पाहत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.मोदी सरकार सर्वसामान्य जनता, शेतकरी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे नसून ते फक्त मूठभर धनदांडग्यांचे सरकार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. मोदी सत्तेत आल्यानंतर देशातील सर्व घटकांचे अच्छे दिन संपल्याचे दिसत आहे. लोकांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष 26 ते 31 मे दरम्यान आंदोलन करणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.