शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

कापूस बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा!

By admin | Updated: July 1, 2014 00:51 IST

विदर्भात अजूनपर्यंत पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाला नसला, तरी शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची जोरदार खरेदी सुरू केली आहे. गतवर्षी सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता,

शेतकऱ्यांची वणवण : कृषी विभागाचे मौन नागपूर : विदर्भात अजूनपर्यंत पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाला नसला, तरी शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची जोरदार खरेदी सुरू केली आहे. गतवर्षी सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता, यंदा अनेकांनी कापूस लागवडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारात अचानक कापूस बियाण्याची मागणी वाढली आहे. परंतु काही दुकानदार या संधीचा गैरफायदा घेऊन अधिक मागणी असलेल्या कापूस बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.माहिती सूत्रानुसार सध्या बाजारात अजित-१५५ व अजित-१९९ या वाणाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु गत काही दिवसांपासून या दोन्ही वाणांचा संपूर्ण जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या मते, काही दुकानदार अजित-१५५ किंवा अजित-१९९ हवे असल्यास, त्यासोबत इतर बियाणे घेण्याची अट घालत आहे. यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होत असून, त्यांना दुकानदारांच्या साठेबाजीला बळी पडावे लागत आहे. वास्तविक कृषी विभागाने यापूर्वीच ‘मागेल त्याला मुबलक बियाणे’ मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु सध्या बाजारात त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यात एकूण ५ लाख ९३ हजार ८०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे.त्यापैकी कृषी विभागाने यंदा सोयाबीनसाठी २ लाख २२ हजार ४४८ हेक्टर, कापसासाठी १ लाख २४ हजार ६६५, भात ७८ हजार ८१२, ज्वारी ४ हजार ९९२, मका ५८८, भुईमुग २ हजार ८१५ व तूर पिकाचे ४४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. परंतु प्रत्यक्षात कापसाच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)