शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

कापूस बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा!

By admin | Updated: July 1, 2014 00:51 IST

विदर्भात अजूनपर्यंत पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाला नसला, तरी शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची जोरदार खरेदी सुरू केली आहे. गतवर्षी सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता,

शेतकऱ्यांची वणवण : कृषी विभागाचे मौन नागपूर : विदर्भात अजूनपर्यंत पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाला नसला, तरी शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची जोरदार खरेदी सुरू केली आहे. गतवर्षी सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता, यंदा अनेकांनी कापूस लागवडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारात अचानक कापूस बियाण्याची मागणी वाढली आहे. परंतु काही दुकानदार या संधीचा गैरफायदा घेऊन अधिक मागणी असलेल्या कापूस बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.माहिती सूत्रानुसार सध्या बाजारात अजित-१५५ व अजित-१९९ या वाणाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु गत काही दिवसांपासून या दोन्ही वाणांचा संपूर्ण जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या मते, काही दुकानदार अजित-१५५ किंवा अजित-१९९ हवे असल्यास, त्यासोबत इतर बियाणे घेण्याची अट घालत आहे. यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होत असून, त्यांना दुकानदारांच्या साठेबाजीला बळी पडावे लागत आहे. वास्तविक कृषी विभागाने यापूर्वीच ‘मागेल त्याला मुबलक बियाणे’ मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु सध्या बाजारात त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यात एकूण ५ लाख ९३ हजार ८०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे.त्यापैकी कृषी विभागाने यंदा सोयाबीनसाठी २ लाख २२ हजार ४४८ हेक्टर, कापसासाठी १ लाख २४ हजार ६६५, भात ७८ हजार ८१२, ज्वारी ४ हजार ९९२, मका ५८८, भुईमुग २ हजार ८१५ व तूर पिकाचे ४४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. परंतु प्रत्यक्षात कापसाच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)