शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शस्त्र उचलले... पण लढायचं कुणाशी?

By admin | Updated: October 10, 2014 22:58 IST

ऐका दाजिबा..---

‘आयला प्रचार करायचा म्हंजी आवघड जागेचं दुखणं होऊन बसलंया! उमीदवारानं पक्षाचं झेंडं, टोप्या, पताका, पत्रकं समदी हत्यारं दिली; पन् लढायचं कुणाबरूबर? नारूनं पारावर प्रश्न उपस्थित केला. ‘आता हे काय खुळ काढलंस? लढायच्या टायमाला हत्यार टाकून पळायचं म्हंजी, उमीदार काय म्हंतील? ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा,’ आसं म्हंतील लोकं! पन् मला एक कळंना, असा पळपुटा इच्यार तुझ्या डोस्क्यात आलाच कसा?’ शिरपानं विचारलं. ‘आरं, पक्षांनी आपल्या जोडीदाराबरूबर ‘घटस्फोट’ घेतल्यामुळं सगळी राजकीय गणितंच बिघडून गेल्याती. कालपर्यंत एकमेकांच्या हातात हात घालून चालणारे आज अचानक एकमेकांच्या पायात पाय अडकवून पाडायची योजना आखू लागलेत! काय म्हणायचं याला?’ नारूनं खंत बोलून दाखविली. ‘ह्यालाच राजकारण म्हंत्यात. खुर्चीवर बसायचं म्हंजी ‘ह्याला गाड नि त्याला गाड’ आसंच राजकारण करावं लागतंया!’ दाजिबा म्हणाला. ‘आरं पन् ज्यांच्या इरोधात प्रचार करायचा ती आपलीच माणसं हायती. ह्यो पाव्हण्याच्या हातानं साप मारायचा उमीदवारांचा डाव हाय! आडकित्त्यात घावल्यागत झालंया बग! आयला ह्यांचं व्हायचं राजकारण आन् आपलं व्हायचं मरण! रोज एकमेकांची तोंड बघायला लागत्याती आपल्याला. उमीदवारांचं काय एकदा निवडूक झाली की त्यांचं दर्शन थेट पाच वर्षांनीच!’ नारूनं दुखणं सांगितलं. खरंय राव. चार-दोन जागांसाठी पंचवीस वर्षाचा घरोबा तुटतो काय आन् पंधरा वर्षांच्या संसारात मीठ पडतं काय... ‘घराला घुस लागली म्हणून कुणी घर पाडतं का?’ घुशीचा बंदोबस्त केला आसता म्हंजी काम भागलं आसतं! पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? पक्षानं कोंडी केल्यामुळं रोज मांडीला मांडी लावून बसणारी मंडळी एकमेकांना पाण्यात बगू लागलीय!’ दाजिबानं री ओढली. ‘तरी म्हणलं एका ताटात जेवणारं मास्तर आता एवढं लांब-लांब का राहत्यात. आन् किसनाबी नाक फेंदारून बगल देऊन निघून जातूया! हे समदं ‘घटस्फोटा’चं कारस्थान हाय! सदानं सांगितलं. ‘आरं पन् पक्षांनी ‘घटस्फोट’ घेतला म्हणून काय कार्यकर्त्यांनीबी आपल्या माणसांपास्नं ‘फारकत’ घ्याची व्हय? हे आपल्याला नाय पटत बुवा.’ नारू कळवळून बोलला. ‘पन् आता रणशिंग फुकलंय. झेंडा खाली ठेवून चालणार नाय. यंदाच्या निवडणुकीचा प्रचार म्हंजी महादेवाच्या पिंडीवरला इंचू हाय!’ दाजिबा म्हणाला. ‘ते कसं काय?’ नारूनं उत्सुकतेनं विचारलं. आरं, जसं इंचू काढावा तर महादेवाला लागतंय आन् नाय काढावा तर देवाचा अपमान; तसंच प्रचार करावा तर आपली माणसं दुखावणार आन् नाय करावा तर उमीदवाराला फटका!’ शिरपा म्हणाला. ‘यंदाच्या निवडणुकीत ‘इकडं आड नि तिकडं विहीर’ अशी गोची झालीया कार्यकर्त्यांची! चला, आताच समजूत काढली पायजे दोस्तांची.’ झेंडे पारावर ठेवून सर्वजण निघतात.

प्रदीप यादव ------