शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

मुंबईतील खड्ड्यांचे बळी दिसत नाहीत का?

By admin | Updated: February 14, 2017 03:57 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाषाणहृदयी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाषाणहृदयी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का, खड्ड्यांमुळे बळी पडणाऱ्या मुंबईकरांना पाहून तुमच्या हृदयावर कसला परिणाम झाल्याचे कधी जाणवले नाही. मग तुमच्या या असल्या हृदयांना काय म्हणायचे, असा पलटवार भाजपाने केला आहे.नोटाबंदीच्या मुद्द्यावरून सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली आहे. जाहीर सभांमधून दोन्ही नेते एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. नोटाबंदीमुळे भ्रष्ट नेत्यांची अडचण झाली मग तुम्हाला का त्रास झाला, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. यावर, नोटाबंदीमुळे दोनशेहून अधिक माणसे हकनाक दगावली. लादलेल्या निर्णयामुळे दोनशे नागरिक दगावले त्याच्या वेदना झाल्या. त्या वेदनांकडे डोळेझाक करून मोदींचा उदो उदो तुम्ही करताय तितका पाषाणहृदयी मी नाही, असे चोख प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेत दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी खड्ड्यातले बळी दिसत नाहीत का, असा प्रश्न पत्रकार परिषदेत केला. मुंबईप्रमाणेच शांघायची स्थिती आहे. मात्र, तेथील कचरा, सांडपाणी व्यवस्थापन उत्तम मानले जाते. चीनचे राष्ट्राध्यक्ष झी चिनपिंग भारत दौऱ्यावर असता मुंबई-शांघाय भगिनी शहरे बनविण्याचा करार झाला होता. मात्र, सेनेने सांडपाणी, कचरा व्यवस्थापनाबाबत पावले उचलली नाहीत. याबाबत पालिका प्रतिसाद देत नसल्याचे शांघायच्या महापौरांनी म्हटल्याचे भांडारी यांनी सांगितले.(प्रतिनिधी)