शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

वाहनचालकांच्या माथी आणखी एक टोल

By admin | Updated: August 21, 2016 06:08 IST

ठाणे शहरासह जिल्ह्याला टोलचा विळखा पडल्याने ठाणेकर मेटाकुटीला आले असताना आता त्यांच्या माथी आणखी एका टोलचा भुर्दंड पडणार आहे. ठाणे ते बोरीवली या प्रवासाला पर्याय

ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्याला टोलचा विळखा पडल्याने ठाणेकर मेटाकुटीला आले असताना आता त्यांच्या माथी आणखी एका टोलचा भुर्दंड पडणार आहे. ठाणे ते बोरीवली या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजिनीवाडी ते बोरीवलीदरम्यान संजय गांधी उद्यानातून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित भुयारी मार्गासाठी टोल लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे या १० मिनिटांच्या प्रवासासाठीही ठाणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मागील युती सरकारच्या काळात महाराष्ट्रात नवनवीन रस्ते, महामार्ग झाले. परंतु, या सर्वांपोटी ‘टोलधाड’ पडल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा युती शासन सत्तेत आल्यानंतर आणखी एका टोलचा भुर्दंड ठाणेकरांना या भुयारी मार्गाच्या निमित्ताने सोसावा लागणार आहे. ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी टिकुजिनीवाडी ते बोरीवलीपर्यंत ११ किमीचा हा सहापदरी भुयारी रस्ता संपूर्णपणे वन विभागाच्या जागेत बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च केला जाणार असून हे अंतर केवळ १० मिनिटांत कापले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) सल्लागार नेमण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या ठाणे ते बोरिवली हा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे एक तास लागतो. बोरिवलीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेटजवळ या भुयारी मार्गाची दुसरी बाजू खुली होणार आहे.दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यासाठी या प्रकल्पासाठी ‘एमएसआरडीसी’ला कार्यान्वित यंत्रणा म्हणून घोषित केले आहे. तसेच यासाठी सुसाध्यता अभ्यास व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असेही स्पष्ट केले आहे. भुयारी मार्गासाठी रस्ते खासगीकरणाच्या धोरणात आवश्यक तरतूद करून येथे टोलचे दरही निश्चित करून सुसाध्यता अहवालात त्याचा समावेश करावा, असेही या बैठकीत ठरले. प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास पायाभूत समितीची पुढील मान्यता घ्यावी, असे सरकारने शुक्रवारी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. यामुळे ठाणेकरांना आपला प्रवास पाऊण ते एक तासावरून १० मिनिटांचा करायचा असेल, तर आता या नव्या भुयारी मार्गासाठी टोल भरावा लागणार, हे मात्र यातून निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)सहापदरी मार्गटिकुजिनीवाडी ते बोरीवलीपर्यंत ११ किमीचा हा सहापदरी भुयारी रस्ता बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या ठाणे ते बोरीवली हा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे एक तास लागतो. हा भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर हा प्रवास १० मिनिटांमध्ये करता येईल.