शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांच्या माथी आणखी एक टोल

By admin | Updated: August 21, 2016 06:08 IST

ठाणे शहरासह जिल्ह्याला टोलचा विळखा पडल्याने ठाणेकर मेटाकुटीला आले असताना आता त्यांच्या माथी आणखी एका टोलचा भुर्दंड पडणार आहे. ठाणे ते बोरीवली या प्रवासाला पर्याय

ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्याला टोलचा विळखा पडल्याने ठाणेकर मेटाकुटीला आले असताना आता त्यांच्या माथी आणखी एका टोलचा भुर्दंड पडणार आहे. ठाणे ते बोरीवली या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजिनीवाडी ते बोरीवलीदरम्यान संजय गांधी उद्यानातून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित भुयारी मार्गासाठी टोल लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे या १० मिनिटांच्या प्रवासासाठीही ठाणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मागील युती सरकारच्या काळात महाराष्ट्रात नवनवीन रस्ते, महामार्ग झाले. परंतु, या सर्वांपोटी ‘टोलधाड’ पडल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा युती शासन सत्तेत आल्यानंतर आणखी एका टोलचा भुर्दंड ठाणेकरांना या भुयारी मार्गाच्या निमित्ताने सोसावा लागणार आहे. ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी टिकुजिनीवाडी ते बोरीवलीपर्यंत ११ किमीचा हा सहापदरी भुयारी रस्ता संपूर्णपणे वन विभागाच्या जागेत बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च केला जाणार असून हे अंतर केवळ १० मिनिटांत कापले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) सल्लागार नेमण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या ठाणे ते बोरिवली हा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे एक तास लागतो. बोरिवलीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेटजवळ या भुयारी मार्गाची दुसरी बाजू खुली होणार आहे.दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यासाठी या प्रकल्पासाठी ‘एमएसआरडीसी’ला कार्यान्वित यंत्रणा म्हणून घोषित केले आहे. तसेच यासाठी सुसाध्यता अभ्यास व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असेही स्पष्ट केले आहे. भुयारी मार्गासाठी रस्ते खासगीकरणाच्या धोरणात आवश्यक तरतूद करून येथे टोलचे दरही निश्चित करून सुसाध्यता अहवालात त्याचा समावेश करावा, असेही या बैठकीत ठरले. प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास पायाभूत समितीची पुढील मान्यता घ्यावी, असे सरकारने शुक्रवारी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. यामुळे ठाणेकरांना आपला प्रवास पाऊण ते एक तासावरून १० मिनिटांचा करायचा असेल, तर आता या नव्या भुयारी मार्गासाठी टोल भरावा लागणार, हे मात्र यातून निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)सहापदरी मार्गटिकुजिनीवाडी ते बोरीवलीपर्यंत ११ किमीचा हा सहापदरी भुयारी रस्ता बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या ठाणे ते बोरीवली हा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे एक तास लागतो. हा भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर हा प्रवास १० मिनिटांमध्ये करता येईल.