शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वाहनचालकांच्या माथी आणखी एक टोल

By admin | Updated: August 21, 2016 06:08 IST

ठाणे शहरासह जिल्ह्याला टोलचा विळखा पडल्याने ठाणेकर मेटाकुटीला आले असताना आता त्यांच्या माथी आणखी एका टोलचा भुर्दंड पडणार आहे. ठाणे ते बोरीवली या प्रवासाला पर्याय

ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्याला टोलचा विळखा पडल्याने ठाणेकर मेटाकुटीला आले असताना आता त्यांच्या माथी आणखी एका टोलचा भुर्दंड पडणार आहे. ठाणे ते बोरीवली या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजिनीवाडी ते बोरीवलीदरम्यान संजय गांधी उद्यानातून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित भुयारी मार्गासाठी टोल लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे या १० मिनिटांच्या प्रवासासाठीही ठाणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मागील युती सरकारच्या काळात महाराष्ट्रात नवनवीन रस्ते, महामार्ग झाले. परंतु, या सर्वांपोटी ‘टोलधाड’ पडल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा युती शासन सत्तेत आल्यानंतर आणखी एका टोलचा भुर्दंड ठाणेकरांना या भुयारी मार्गाच्या निमित्ताने सोसावा लागणार आहे. ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी टिकुजिनीवाडी ते बोरीवलीपर्यंत ११ किमीचा हा सहापदरी भुयारी रस्ता संपूर्णपणे वन विभागाच्या जागेत बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च केला जाणार असून हे अंतर केवळ १० मिनिटांत कापले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) सल्लागार नेमण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या ठाणे ते बोरिवली हा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे एक तास लागतो. बोरिवलीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेटजवळ या भुयारी मार्गाची दुसरी बाजू खुली होणार आहे.दरम्यान, आता मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यासाठी या प्रकल्पासाठी ‘एमएसआरडीसी’ला कार्यान्वित यंत्रणा म्हणून घोषित केले आहे. तसेच यासाठी सुसाध्यता अभ्यास व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असेही स्पष्ट केले आहे. भुयारी मार्गासाठी रस्ते खासगीकरणाच्या धोरणात आवश्यक तरतूद करून येथे टोलचे दरही निश्चित करून सुसाध्यता अहवालात त्याचा समावेश करावा, असेही या बैठकीत ठरले. प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास पायाभूत समितीची पुढील मान्यता घ्यावी, असे सरकारने शुक्रवारी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. यामुळे ठाणेकरांना आपला प्रवास पाऊण ते एक तासावरून १० मिनिटांचा करायचा असेल, तर आता या नव्या भुयारी मार्गासाठी टोल भरावा लागणार, हे मात्र यातून निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)सहापदरी मार्गटिकुजिनीवाडी ते बोरीवलीपर्यंत ११ किमीचा हा सहापदरी भुयारी रस्ता बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या ठाणे ते बोरीवली हा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे एक तास लागतो. हा भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर हा प्रवास १० मिनिटांमध्ये करता येईल.