शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अण्णा मागणार हिशेब

By admin | Updated: October 29, 2014 01:31 IST

विदेशातील काळा पैसा देशात परत आणण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास सामान्य जनतेने पुकारलेल्या लढय़ात एक शिपाई म्हणून आपण सहभागी होऊ,

पारनेर (जि.अहमदनगर) : विदेशातील काळा पैसा देशात परत आणण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास सामान्य जनतेने पुकारलेल्या लढय़ात एक शिपाई म्हणून आपण सहभागी होऊ, असे जाहीर करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकप्रकारे मोदी सरकारविरोधात अप्रत्यक्ष संघर्षाचे बिगूल फुंकले आहे.
शंभर दिवसांत परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा करणा:या मोदी सरकारने दीडशे दिवसानंतर केवळ तीन लोकांची नावे जाहीर केल्याबद्दल त्यांनी खेदयुक्त आश्चर्य व्यक्त केले आहे. 
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले, भाजपाच्या हाती सत्ता दिल्यानंतर शंभर दिवसांत विदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु त्यांचे सरकार सत्तेवर येऊन दीडशे दिवस लोटल्यानंतर केवळ तीन लोकांची नावे जाहीर करण्यात आली व आठ लोकांची यादी तयार असल्याचे सांगण्यात आले. 
विदेशात काळा पैसा असलेल्या भारतीयांची यादी मोठी असून, ती जनतेसमोर आलीच पाहिजे. या काळ्या पैशांतून प्रत्येक भारतीयाच्या नावावर प्रत्येकी तीन लाख रुपये 
जमा करण्याचे आश्वासनही 
देण्यात आले होते. त्यामुळे जनतेने आशावादी राहून मोदी सरकारला मतदान केले.
दोन, तीन, चार नावे जाहीर करून अशा पद्धतीने काळा पैसा देशात येण्यास अनेक वर्षे लागतील. परिणामी मतदारांचा भ्रमनिरास होईल, असे सांगत काळ्या पैशांसंदर्भातील प्रत्येक व्यक्तीचे नावे समोर आलेच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. काळा पैसा देशात परत आला नाही तर त्या विरोधात नेतृत्व करणारे अनेकजण पुढे येतील. त्या आंदोलनात एक शिपाई म्हणून मी काम करणार आहे, असेही हजारे म्हणाले. (प्रतिनिधी)