शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तर अंगणवाडी कर्मचारी विधानसभेवर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 03:30 IST

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी वाडा येथे मोर्चात बोलताना दिला.

वाडा : अंगणवाडी कर्मचा-यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते तातडीने सोडविले नाहीत तर येत्या हिवाळी अधिवेशनात लाखोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी धडक देतील असा गंभीर इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी वाडा येथे मोर्चात बोलताना दिला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या घरावर मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी घरावर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्याने मोर्चेकरांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाला संबोधित करताना एम.ए. पाटील पुढे म्हणाले, की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे आदिवासी विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग व आरोग्य विभाग या तिघांशी निगडीत असून या तिन्ही मंत्र्यांनी एकत्रित येऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर तोडगा काढावा. अंगणवाडी लाभार्थीना दिवसाला ४ रूपये ९२ पैशाचा आहार शासन देत आहे. पंरतु हे पैसे फारच अल्प आहेत. आजच्या महागाईमध्ये ४ रूपये ९२ पैशांमध्ये लाभार्थीना खूप कमी आहार मिळतो. लाभार्थीना एकवेळचा तरी पोटभर आहार द्यावा तसेच आहारासाठी खर्च झालेले पैसे सहा सहा महिन्यात देण्याची पध्दत बंद करून प्रत्येक महिन्यात आहारासाठी खर्च झालेले पैसे त्या त्या बचतगटांना देण्यात यावेत यामुळे लाभार्थाच्या आहारामध्ये खंड पडणार नाही असे संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले. (वार्ताहर)कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले असून बालमृत्यू होत असून ते थांबविण्यासाठी शासनाने काय केले पाहिजे या व अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार संदीप चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, उपाध्यक्षा मंगला सराफ, विनिता देशमुख यांच्यासह जिल्हयातील अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.