शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

...आणि मुख्यमंत्र्यांचे विमान लँड न होताच परतले

By admin | Updated: July 25, 2016 17:18 IST

विमान अमरावतीच्या हवाई हद्दीत दाखल झाले, मात्र पावसाळी वातावरण पाहून पायलट अमेय यांनी बेलोरा विमानतळावर विमान उतरविण्यास स्थिती अयोग्य असल्याचे सुचविले.

ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. २५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमान सोमवारी अमरावतीत लँड झालेच नाही. वैमानिकाने बेलोरा धावपट्टीवर विमान उतरविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र, ढगाळ वातावरण आणि रेन फॉलचा इशारा, एटीएस टॉवर यंत्रणेकडून वैमानिकाला मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान आकाशात तीन घिरट्या मारून मुंबईला परतले. 

माजी राज्यपाल, दिवंगत नेते रा.सू.गवई यांच्या स्मारक संकुलाच्या नियोजित भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी २५ जुलै रोजी विमानाने अमरावतीला येणार होते. त्यांचा नियोजित दौरादेखील प्रशासनाला प्राप्त झाला होता. मुख्यमंत्री अमरावतीत केवळ ३५ मिनिटांसाठी येणार असल्याने त्यांच्या ‘मिनिट टू मिनिट’ दौऱ्याबाबत प्रशासन सज्ज होते. बेलोरा विमानतळ ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या कार्यक्रम स्थळापर्यंत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सोमवारी मुंबईहून सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी दिल्ली येथील तनेजा एअर स्पेस कंपनीचे सहा आसनी चार्टर्ड विमान अमरावतीच्या दिशेने मुख्यमंत्र्यांना घेऊन निघाले. बेलोरा विमानतळ परिसरात सकाळी १० वाजताच्या सुमारास हे विमान पोहोचले. परंतु ‘लँडिंग’दरम्यान वैमानिकाला धावपट्टी दिसत नव्हती. 

अमेय नामक वैमानिकाने नागपूर येथील विमानतळाच्या एटीएस टॉवर यंत्रणेशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांचे विमान उतरविता येईल काय? याबाबत त्यांनी विचारणा केली. मात्र, अकोला राष्ट्रीय महामार्ग परिसरात रेन फॉल आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे धावपट्टीवर विमान उतरविणे धोकादायक असल्याचा इशारा एटीएस टॉवर यंत्रणेकडून वैमानिकाला देण्यात आला. विमानाचे ‘लँडिंग’ अतिशय धोकादायक ठरेल, असे संकेत वैमानिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

तरीसुद्धा वातावरण स्वच्छ होण्याची प्रतीक्षा करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या आग्रहाखातर वैमानिकाने आकाशात तीन वेळा घिरट्या मारल्या. अखेर १० ते १५ मिनिटे आकाशात घिरट्या मारल्यानंतर वैमानिकाने मुख्यमंत्र्यांना मुंबईला परत नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे विमान १२ वाजून १० मिनिटांनी मुंबई विमानतळावर पोहोचले. यानंतर मुख्यमंत्री थेट विधिमंडळात पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. या विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक सुुिमत वानखडे असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना मुंबईहून घेऊन येणाऱ्या वैमानिकाशी सतत संपर्क ठेवून होतो. विमान ‘टेक आॅफ’ झाले तेव्हा अमरावतीत जोरदार पाऊस असल्याची माहिती अमेय नामक वैमानिकाला देण्यात आली. या वैमानिकाला बेलोरा विमानतळ धावपट्टीची इत्थंभूत माहिती असल्यामुळे निश्चिंत होतो. मात्र, अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. वैमानिकाला धावपट्टी दिसत नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान उतरवता आले नाही. - एम.पी. पाठक, प्रबंधक, बेलोरा विमानतळ, अमरावतीअन पालकमंत्री, आमदारांचा विमान प्रवास हुकलामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी २५ जुलै रोजी दिवंगत नेते रा.सू. गवई यांच्या स्मारक संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला येणार होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच विमानात पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकूर, आ. अनिल बोंडे आदी मुंबईला विधिमंडळात उपस्थित राहण्यासाठी जाणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचे विमान ‘लँड’ न झाल्याने त्यांचा विमानप्रवास हुकला. पालकमंत्री प्रवीण पोटेंसह अन्य आमदारांना आता रेल्वेने मुंबई गाठावे लागणार आहे.