शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...अन् घराची लॉटरी लागली

By admin | Updated: February 25, 2016 02:52 IST

म्हाडाच्या कोकण मंडळातील विरार, ठाणे, मीरारोड आणि वेंगुर्ला येथील ४ हजार २७५ घरांची सोडत बुधवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. या वेळी अनेकांची घरांची वणवण

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातील विरार, ठाणे, मीरारोड आणि वेंगुर्ला येथील ४ हजार २७५ घरांची सोडत बुधवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. या वेळी अनेकांची घरांची वणवण थांबली असली, तरी अनेक अर्जदार नव्या स्वप्नांची गुंफण करण्यासाठी पुन्हा प्रयत्न इराद्याने सभागृहातून निघाले. त्या वेळी कोणाच्या चेहऱ्यावर हसू, तर काहींच्या चेहऱ्यावर आसू असे चित्र निर्माण झाले होते.आश्चर्याची बाब म्हणजे, सभागृहात उपस्थितांपैकी एकाही व्यक्तीला पहिल्या तासाभरात निघालेल्या सोडतीमध्ये घर लागले नव्हते. मात्र, त्यानंतर काढलेल्या मीरारोड येथील सोडतीमध्ये संतोष कांबळे (२७) आणि इक्बाल खान (२५) या सभागृहात उपस्थित तरुणांची नावे जाहीर झाली. या दोन्ही तरुणांनी स्वत:च्या नावाने प्रथमच अर्ज केला होता.या आधी मंगळवारी रात्रीपासूनच घरांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांनी रंगशारदा सभागृहाबाहेर मुक्काम ठोकला होता. त्यामुळे सकाळी आलेल्या अर्जदारांची त्यात भर पडल्याने, रांग सुमारे दोन किलोमीटर दूरवर गेली होती. स्थानिक पोलिसांमार्फत आॅनलाइन लॉटरी पाहण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत होते. मात्र, घराच्या आशेपोटी आलेले अर्जदार सभागृहाबाहेरील मंडपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.वणवण थांबली...!माझा सोडतीवर विश्वास नव्हता. अनेकांनी सोडतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून अर्ज भरला. घर लागेल, अशी आशाही नव्हती. मात्र, नशिबाने साथ दिली आणि घर लागले. त्यामुळे सोडतीच्या पारदर्शकतेवर विश्वास बसला.- संतोष कांबळे,(विजेता अर्जदार)हक्काचे घर मिळालेएकत्रित कुटुंब असल्याने आजोबांसोबत मीरारोडला राहणाऱ्या घरातील जागा अपुरी पडत होती. म्हणून दुसऱ्या घराचा शोध सुरू होता. मी पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि घर लागले. आता आजोबांच्या मालकीव्यतिरिक्त हक्काचे स्वमालकीचे घर झाले आहे.- इक्बाल खान,(विजेता अर्जदार)आत्ता हप्त्याचे टेन्शनमुंबई महानगरपालिकेत कामाला असल्याने परळ गावातील पाणीखात्याच्या वसाहतीमध्ये राहत आहे. मार्च २०१७ मध्ये निवृत्त होत असल्याने, डिसेंबर २०१६ मध्ये घर खाली करावे लागणार होते. मात्र, २२ लाख रुपये कुठून आणायचे, याचे टेन्शन आहे.- काशिराम कदम,(विजेता अर्जदार)