शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची परवडच

By admin | Updated: September 25, 2016 02:16 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. अभियांत्रिकीच्या चौथ्या सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. अभियांत्रिकीच्या चौथ्या सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिकांत अनेक परीक्षार्थींना अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. ही चूक नेमकी का झाली आहे याला कोण जबाबदार आहे, हे अद्यापही परीक्षा विभागाच्या लक्षात आलेले नाही. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या सत्रात ‘कंट्रोल सिस्टम’ नावाचा पेपर असून या पेपरमध्येच विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना याबाबत महाविद्यालय तसेच विद्यापीठात विचारणा केली. परंतु कुठलेही ठोस उत्तर त्यांना मिळाले नाही. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा घोळ झाला असल्याचे मान्य केले. ‘कंट्रोल सिस्टम’ या पेपरमध्ये हे प्रमाण अधिक असून याचे कारण शोधण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.नागपूर विद्यापीठाने निकालांचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनुपस्थित किंवा अनुत्तीर्ण दाखविण्याचे प्रकार याअगोदरदेखील झाले आहेत. प्रत्येकवेळी अशी चूक तांत्रिक असल्याचेच उत्तर देण्यात येते. परंतु कंपनीवर कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेन्ट’ धोक्यातराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन सुरू झाल्यामुळे निकालांचे घोळ कमी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात आता तर पेपर न तपासताच निकाल जाहीर होत असल्याचे दिसून येत आहे. अभियांत्रिकीच्या आठव्या सत्रातील वैकल्पिक विषयांचे पेपरच तपासण्यात आले नाही व यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविण्यात आले. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे विविध नामांकित कंपन्यांमध्ये ‘प्लेसमेन्ट’ झाले आहे. अशा स्थितीत विद्यापीठाच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.अभियांत्रिकीच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन’ शाखेच्या सहाव्या सत्रातील ‘कॉम्प्युटर सिस्टम’ आणि आठव्या सत्रातील ‘रॅनडिम सिग्नल थेअरी आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन’ असे वैकल्पिक विषय आहेत.या पेपरची तपासणी होण्याआधीच विद्यापीठाने निकाल जाहीर केला. ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे इलेक्टिव्ह विषय घेतले होते त्यांना गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण किंवा अनुपस्थित दाखवण्यात आले. या विषयातील सर्वच विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे झाले याची महाविद्यालयांनी चौकशी केली असता तेव्हा ही बाब समोर आली. त्यानंतर या वैकल्पिक विषयांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका मिळालेली नाही.यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी म्हणाले, ही चूक महाविद्यालयांमुळेच झाली आहे. विद्यार्थ्यांनी वैकल्पिक विषय बदलले. परंतु याची माहिती महाविद्यालयांनी विद्यापीठाला दिली नाही. त्यामुळे अनेकांचे निकाल अनुपस्थित म्हणून आले.————-पुनर्मूल्यांकनाचाही गोंधळ सुरूचअभियांत्रिकीच्या अनेक परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. अद्याप पुनर्मूल्यांकनाचा निकाल हाती नाही आणि दुसरीकडे पुरवणी परीक्षा तोंडावर अशा कात्रीत विद्यार्थी सापडले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आपल्याला कमी गुण मिळाले अशी शंका आल्याने त्यांनी विद्यापीठाच्या प्रक्रियेप्रमाणे उत्तरपत्रिकांच्या ‘झेरॉक्स’ प्रतींसाठी अर्ज केले. या प्रतींच्या आधारावर विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. परंतु तीन महिने उलटून गेल्यावरदेखील अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना निकालाचीच प्रतीक्षा आहे. मागील हिवाळी परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकालदेखील गेल्या पाच महिन्यांपासून मिळाले नसल्याची काही विद्यार्थ्यांची तक्रार आहे.