शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत घोटाळ्यांचा उच्चांक

By admin | Updated: May 12, 2017 03:06 IST

नागपूर, अमरावती इत्यादी विभागांतील आदिवासी विभाग ‘संवेदनशील’ म्हणून गणले जातात. आरोग्य, कुपोषण, बेरोजगारी

दीप्ती देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर, अमरावती इत्यादी विभागांतील आदिवासी विभाग ‘संवेदनशील’ म्हणून गणले जातात. आरोग्य, कुपोषण, बेरोजगारी, उपासमार इत्यादी समस्यांनी या विभागांना विळखा घातला आहे. या समस्यांतून आदिवासी समाजाला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार पुरेशी आर्थिक मदत करण्यास कमी पडत आहे. मात्र, मिळत असलेल्या मदतीतही प्रकल्प अधिकारी आपले हात धुऊन घेत आहेत. २००४ ते २००९ या काळात अमरावती विभागात सुमारे १७ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला.अशिक्षित लोकांना पोटापुरते मिळावे, यासाठी राज्य सरकारने त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यास निधी उपलब्ध केला; परंतु अधिकाऱ्यांनी या निधीतील पैसे स्वत:च्या पदरात पाडले. घरकुल, दुभती जनावरे पुरवण्याच्या योजना व अन्य काही योजनांची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने एम. जी. गायकवाड समितीने याबाबत निष्कर्ष न काढता चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आकडेवारीपेक्षाही अधिक घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. विजयकुमार गावित आदिवासी विकासमंत्री असताना, म्हणजेच २००४ ते २००९ या काळात आदिवासी कल्याणकारी योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याने विशेष तपास पथक नेमून याची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका नाशिकचे बहिराम मोतीराम यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी यांच्याद्वारे उच्च न्यायालयात केली. या याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकारने या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. त्यानुसार एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेत अन्य चार सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती इत्यादी आदिवासी विभागांच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची चौकशी केली व उच्च न्यायालयात अहवालही सादर केला.अमरावती अतिरिक्त आदिवासी आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या धारणी, किनवट, अकोला आणि औरंगाबादच्या प्रकल्प अधिकाऱ्यांचीही या समितीने चौकशी केली. या चार प्रकल्पांमधून एकूण १६ कोटी ६४ लाख २१ हजार २२० रुपयांचा घोटाळा झाल्याचे गायकवाड समितीच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. तथापि, अनेक योजनांच्या कागदपत्रांअभावी समितीने प्रकल्प अधिकाऱ्यांनी अपहार केला की नाही, याचा निष्कर्ष काढला नाही. त्यामुळे आणखी काही कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. २००४ ते २००९ या काळत किनवट प्रकल्प अधिकाऱ्यांनी ९ कोटी २८ लाख ५८ हजार २०४ रुपये हडपले. तर अतिसंवेदनशील विभाग असलेल्या धारणी प्रकल्प अधिकाऱ्याने ५ कोटी २८ लाख, ८२ हजार ४५५ रुपये खिशात घातले. अकोला १ कोटी, ३१ लाख ६४ हजार ०८७ व औरंगाबाद ७५ लाख १६ हजार ४७४ रुपयांचा घोटाळा करण्यात आला. (क्रमश:)खोटी कागदपत्रे दाखवून निधी हडपला-अमरावती विभागातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदिवासी लोकांच्या रोजगारावरच गदा आणली. आदिवासी लोकांसाठी दुभती जनावरे पुरवठा योजना, शिलाई मशीन, भाजीचे दुकान, स्टेशनरी, सायकल व अन्य योजनांसाठी राज्य सरकारने अल्प निधी पुरवला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी यासंबंधी खोटी कागदपत्रे बनवून हाच निधी हडपल्याचे निदर्शनास आले आहे.