शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

अमरावतीत घोटाळ्यांचा उच्चांक

By admin | Updated: May 12, 2017 03:06 IST

नागपूर, अमरावती इत्यादी विभागांतील आदिवासी विभाग ‘संवेदनशील’ म्हणून गणले जातात. आरोग्य, कुपोषण, बेरोजगारी

दीप्ती देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर, अमरावती इत्यादी विभागांतील आदिवासी विभाग ‘संवेदनशील’ म्हणून गणले जातात. आरोग्य, कुपोषण, बेरोजगारी, उपासमार इत्यादी समस्यांनी या विभागांना विळखा घातला आहे. या समस्यांतून आदिवासी समाजाला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार पुरेशी आर्थिक मदत करण्यास कमी पडत आहे. मात्र, मिळत असलेल्या मदतीतही प्रकल्प अधिकारी आपले हात धुऊन घेत आहेत. २००४ ते २००९ या काळात अमरावती विभागात सुमारे १७ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला.अशिक्षित लोकांना पोटापुरते मिळावे, यासाठी राज्य सरकारने त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यास निधी उपलब्ध केला; परंतु अधिकाऱ्यांनी या निधीतील पैसे स्वत:च्या पदरात पाडले. घरकुल, दुभती जनावरे पुरवण्याच्या योजना व अन्य काही योजनांची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने एम. जी. गायकवाड समितीने याबाबत निष्कर्ष न काढता चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आकडेवारीपेक्षाही अधिक घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. विजयकुमार गावित आदिवासी विकासमंत्री असताना, म्हणजेच २००४ ते २००९ या काळात आदिवासी कल्याणकारी योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याने विशेष तपास पथक नेमून याची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका नाशिकचे बहिराम मोतीराम यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी यांच्याद्वारे उच्च न्यायालयात केली. या याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकारने या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. त्यानुसार एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेत अन्य चार सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती इत्यादी आदिवासी विभागांच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची चौकशी केली व उच्च न्यायालयात अहवालही सादर केला.अमरावती अतिरिक्त आदिवासी आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या धारणी, किनवट, अकोला आणि औरंगाबादच्या प्रकल्प अधिकाऱ्यांचीही या समितीने चौकशी केली. या चार प्रकल्पांमधून एकूण १६ कोटी ६४ लाख २१ हजार २२० रुपयांचा घोटाळा झाल्याचे गायकवाड समितीच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. तथापि, अनेक योजनांच्या कागदपत्रांअभावी समितीने प्रकल्प अधिकाऱ्यांनी अपहार केला की नाही, याचा निष्कर्ष काढला नाही. त्यामुळे आणखी काही कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. २००४ ते २००९ या काळत किनवट प्रकल्प अधिकाऱ्यांनी ९ कोटी २८ लाख ५८ हजार २०४ रुपये हडपले. तर अतिसंवेदनशील विभाग असलेल्या धारणी प्रकल्प अधिकाऱ्याने ५ कोटी २८ लाख, ८२ हजार ४५५ रुपये खिशात घातले. अकोला १ कोटी, ३१ लाख ६४ हजार ०८७ व औरंगाबाद ७५ लाख १६ हजार ४७४ रुपयांचा घोटाळा करण्यात आला. (क्रमश:)खोटी कागदपत्रे दाखवून निधी हडपला-अमरावती विभागातील प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदिवासी लोकांच्या रोजगारावरच गदा आणली. आदिवासी लोकांसाठी दुभती जनावरे पुरवठा योजना, शिलाई मशीन, भाजीचे दुकान, स्टेशनरी, सायकल व अन्य योजनांसाठी राज्य सरकारने अल्प निधी पुरवला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी यासंबंधी खोटी कागदपत्रे बनवून हाच निधी हडपल्याचे निदर्शनास आले आहे.