शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथकरही ‘प्रभू’कृपेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 29, 2016 04:05 IST

मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला.

अंबरनाथ : मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला. तेच धोरण अंबरनाथच्या कोकोळे येथील जीआयपी टँकमधील पाण्यासंदर्भात घेण्याची गरज आहे. हे पाणी रेल नीरच्या माध्यमातुन विकण्यापेक्षा ते पाणी अंबरनाथकरांना वळविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पाणी प्रश्नावर रेल्वेमंत्री ‘प्रभू’ यांची ‘कृपा’ होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मलंगगडाच्या डोंगर दऱ्यांमधून वाहणारे पाणी अडविण्यासाठी ब्रिटीशांनी रेल्वेच्या माध्यमातून १९१५ मध्ये जीआयपी टँक (धरण) बांधला. रोज चार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्याची क्षमता या धरणाची आहे. या धरणातून पूर्वी कल्याण रेल्वे स्थानक आणि रेल्वे संकुलाला पाणी पुरवठा केला जात होता. मात्र १९९७ मध्ये हा पुरवठा बंद करण्यात आला. तेव्हापासून हे धरण वापरण्यात येत नव्हते. अखेर रेल्वे प्रशासनाने या धरणाच्या पाण्याचा वापर करुन रेल नीर हा पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारला. मात्र या ठिकाणचे पाणी या प्रकल्पासाठी कमी प्रमाणात वापरण्यात येते. या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शुध्द झाले तरी दुर्गंधी कशी घालविणार हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून पाणी घेण्यात येते. त्यामुळे या धरणाचा वापर अंबरनाथसाठी करणे शक्य आहे. हे धरण रेल्वेने पालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दिल्यास या पाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शहराला पुरविणे शक्य होणार आहे. अस्तित्वातील पाण्याचे स्त्रोत नागरिकांची तहान भागविण्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यामुळे या धरणातील पाणी अंबरनाथला देण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी केली आहे. या संदर्भातील पत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)