शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अंबरनाथकरही ‘प्रभू’कृपेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 29, 2016 04:05 IST

मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला.

अंबरनाथ : मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला. तेच धोरण अंबरनाथच्या कोकोळे येथील जीआयपी टँकमधील पाण्यासंदर्भात घेण्याची गरज आहे. हे पाणी रेल नीरच्या माध्यमातुन विकण्यापेक्षा ते पाणी अंबरनाथकरांना वळविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पाणी प्रश्नावर रेल्वेमंत्री ‘प्रभू’ यांची ‘कृपा’ होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मलंगगडाच्या डोंगर दऱ्यांमधून वाहणारे पाणी अडविण्यासाठी ब्रिटीशांनी रेल्वेच्या माध्यमातून १९१५ मध्ये जीआयपी टँक (धरण) बांधला. रोज चार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्याची क्षमता या धरणाची आहे. या धरणातून पूर्वी कल्याण रेल्वे स्थानक आणि रेल्वे संकुलाला पाणी पुरवठा केला जात होता. मात्र १९९७ मध्ये हा पुरवठा बंद करण्यात आला. तेव्हापासून हे धरण वापरण्यात येत नव्हते. अखेर रेल्वे प्रशासनाने या धरणाच्या पाण्याचा वापर करुन रेल नीर हा पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारला. मात्र या ठिकाणचे पाणी या प्रकल्पासाठी कमी प्रमाणात वापरण्यात येते. या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शुध्द झाले तरी दुर्गंधी कशी घालविणार हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून पाणी घेण्यात येते. त्यामुळे या धरणाचा वापर अंबरनाथसाठी करणे शक्य आहे. हे धरण रेल्वेने पालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दिल्यास या पाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शहराला पुरविणे शक्य होणार आहे. अस्तित्वातील पाण्याचे स्त्रोत नागरिकांची तहान भागविण्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यामुळे या धरणातील पाणी अंबरनाथला देण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी केली आहे. या संदर्भातील पत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)