शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

अंबरनाथकरही ‘प्रभू’कृपेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 29, 2016 04:05 IST

मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला.

अंबरनाथ : मुंबईतील पाणीटंचाई लक्षात घेऊन ऐरोली-कळव्यादरम्यान असलेल्या दिघा धरणातून ठाणे-नवी मुंबईला पाणी देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला. तेच धोरण अंबरनाथच्या कोकोळे येथील जीआयपी टँकमधील पाण्यासंदर्भात घेण्याची गरज आहे. हे पाणी रेल नीरच्या माध्यमातुन विकण्यापेक्षा ते पाणी अंबरनाथकरांना वळविण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पाणी प्रश्नावर रेल्वेमंत्री ‘प्रभू’ यांची ‘कृपा’ होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मलंगगडाच्या डोंगर दऱ्यांमधून वाहणारे पाणी अडविण्यासाठी ब्रिटीशांनी रेल्वेच्या माध्यमातून १९१५ मध्ये जीआयपी टँक (धरण) बांधला. रोज चार दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्याची क्षमता या धरणाची आहे. या धरणातून पूर्वी कल्याण रेल्वे स्थानक आणि रेल्वे संकुलाला पाणी पुरवठा केला जात होता. मात्र १९९७ मध्ये हा पुरवठा बंद करण्यात आला. तेव्हापासून हे धरण वापरण्यात येत नव्हते. अखेर रेल्वे प्रशासनाने या धरणाच्या पाण्याचा वापर करुन रेल नीर हा पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारला. मात्र या ठिकाणचे पाणी या प्रकल्पासाठी कमी प्रमाणात वापरण्यात येते. या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शुध्द झाले तरी दुर्गंधी कशी घालविणार हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून पाणी घेण्यात येते. त्यामुळे या धरणाचा वापर अंबरनाथसाठी करणे शक्य आहे. हे धरण रेल्वेने पालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दिल्यास या पाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शहराला पुरविणे शक्य होणार आहे. अस्तित्वातील पाण्याचे स्त्रोत नागरिकांची तहान भागविण्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यामुळे या धरणातील पाणी अंबरनाथला देण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी केली आहे. या संदर्भातील पत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)