शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

आंबेडकर स्मारकाचा वाद चिघळणार!

By admin | Updated: January 20, 2017 02:34 IST

ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला

नवी मुंबई : ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. खुप संयम पाळला आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला असून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी बैठक आयोजीत केली आहे. ऐरोलीमध्ये आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहळ यांच्या निवासस्थानी नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. नवी मुंबईमध्ये धार्मीक स्थळांवर सुरू असलेल्या कारवाईची माहीती यावेळी आठवले यांना देण्यात आली. अडथळा होत नसलेल्या बुद्धविहारांवरही कारवाई केली जात आहे. महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आंबेडकर स्मारकाचे काम सुरू केले आहे. पण जवळपास ८ महिन्यांपासून बांधकाम ठप्प आहे. पालीका सभागृहाने डोमला मार्बल अच्छादन लावण्याचा ठराव मंजूर केला होता. पण आयआयटीने दिलेला अहवाल व आर्थीक बचतीचे कारण देवून मार्बल न लावण्याचा निर्णय घेतला. नागरीकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर व पालिकेत लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठविल्यानंतरही मार्बल न लावण्यावर प्रशासन ठाम असून सर्व काम ठप्प असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. आठवले यांनीही बांधकाम रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे आंबेडकरी जनतेच्या अस्मीतेचा प्रश्न आहे. काम रखडले असेल तर तुम्ही काय करताय. लोकांना एकत्रीत करा व आवाज उठवा असे आवाहनही आठवले यांनी केले आहे. आठवले यांना भेटण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे, महेश खरे, युवराज मोरे, परमेश्वर गायकवाड, विजय कांबळे, शिला बोधडे व २०० ते ३०० पदाधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत आम्ही खुप संयम ठेवला. शासनाने मुंबईतील इंदू मिलमध्ये स्मारकाचे भुमीपुजन केले पण प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नाही. नवी मुंबईमध्ये महापालिकेने स्मारक उभारण्यास सुरवात केली आहे. काम अंतिम टप्प्यात असताना डोमला मार्बल बसविण्यावरून त्याला आक्षेप घेण्यात आला व काम थांबविले आहे. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.>नवी मुंबईमधील धार्मीक स्थळांवरील कारवाई व रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे रामदास आठवले यांचे लक्ष वेधण्यात आले. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. निवेदन व विनंती करूनही स्मारकाचे काम पुर्ण होत नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असून त्यामध्ये याविषयी अंतीम निर्णय घेण्यात येईल. - सिद्राम ओहोळजिल्हा अध्यक्ष आरपीआय