शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

आंबेडकर स्मारकाचा वाद चिघळणार!

By admin | Updated: January 20, 2017 02:34 IST

ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला

नवी मुंबई : ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारकाच्या रखडलेल्या कामामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. खुप संयम पाळला आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला असून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी बैठक आयोजीत केली आहे. ऐरोलीमध्ये आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहळ यांच्या निवासस्थानी नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. नवी मुंबईमध्ये धार्मीक स्थळांवर सुरू असलेल्या कारवाईची माहीती यावेळी आठवले यांना देण्यात आली. अडथळा होत नसलेल्या बुद्धविहारांवरही कारवाई केली जात आहे. महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आंबेडकर स्मारकाचे काम सुरू केले आहे. पण जवळपास ८ महिन्यांपासून बांधकाम ठप्प आहे. पालीका सभागृहाने डोमला मार्बल अच्छादन लावण्याचा ठराव मंजूर केला होता. पण आयआयटीने दिलेला अहवाल व आर्थीक बचतीचे कारण देवून मार्बल न लावण्याचा निर्णय घेतला. नागरीकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर व पालिकेत लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठविल्यानंतरही मार्बल न लावण्यावर प्रशासन ठाम असून सर्व काम ठप्प असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. आठवले यांनीही बांधकाम रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे आंबेडकरी जनतेच्या अस्मीतेचा प्रश्न आहे. काम रखडले असेल तर तुम्ही काय करताय. लोकांना एकत्रीत करा व आवाज उठवा असे आवाहनही आठवले यांनी केले आहे. आठवले यांना भेटण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे, महेश खरे, युवराज मोरे, परमेश्वर गायकवाड, विजय कांबळे, शिला बोधडे व २०० ते ३०० पदाधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत आम्ही खुप संयम ठेवला. शासनाने मुंबईतील इंदू मिलमध्ये स्मारकाचे भुमीपुजन केले पण प्रत्यक्ष कामाला सुरवात झालेली नाही. नवी मुंबईमध्ये महापालिकेने स्मारक उभारण्यास सुरवात केली आहे. काम अंतिम टप्प्यात असताना डोमला मार्बल बसविण्यावरून त्याला आक्षेप घेण्यात आला व काम थांबविले आहे. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.>नवी मुंबईमधील धार्मीक स्थळांवरील कारवाई व रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे रामदास आठवले यांचे लक्ष वेधण्यात आले. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. निवेदन व विनंती करूनही स्मारकाचे काम पुर्ण होत नसल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असून त्यामध्ये याविषयी अंतीम निर्णय घेण्यात येईल. - सिद्राम ओहोळजिल्हा अध्यक्ष आरपीआय