शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राष्ट्रीय रोमिंगपासून अमरनाथ यात्रेकरू वंचित

By admin | Updated: July 13, 2016 23:18 IST

राज्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला गेले आहेत. राष्ट्रीय रोमिंगची मोफत सुविधा असल्याने बहुसंख्य नागरिकांनी भारत संचार निगम

- अझहर शेख

नाशिक : राज्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला गेले आहेत. राष्ट्रीय रोमिंगची मोफत सुविधा असल्याने बहुसंख्य नागरिकांनी भारत संचार निगम कंपनीचे (बीएसएनएल) पोस्टपेड, प्रीपेड मोबाइल सीमकार्ड घेतले; मात्र महाराष्ट्र सीमा ओलांडल्यानंतर कुठल्याही प्रकारची रोमिंग सुविधा ग्राहकांना मिळत नसल्याने यात्रेकरूंची मोठी गैरसोय होत आहे.अमरनाथ यात्रेसाठी शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने यात्रेक रू गेले आहेत. शनिवारपासून (दि.१३) काश्मीर खोरे धगधगत असून, श्रीनगरपासून तर थेट बालटालपर्यंत निदर्शने आणि जाळपोळ फुटीरवाद्यांकडून केली जात आहे. त्यामुळे पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये सध्या वणवा पेटला आहे. हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा कुख्यात दहशतवादी कमांडर बुरहान वाणीला सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खोरे पेटले आहे. फुटीरवाद्यांनी सैन्य, पोलीस, यात्रेकरूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यामुळे अमरनाथ यात्रेवरही मोठा परिणाम झाला आहे. अशा तणावपूर्ण स्थितीत बीएसएनलचे सीमकार्ड ‘नो-नेटवर्क’ दाखवित असल्यामुळे शहरासह जिल्ह्यातून गेलेल्या यात्रेकरूंचा संपर्क त्यांच्या नातेवाईक-मित्र परिवारापासून तुटला आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय सैन्याने जम्मू येथून काश्मीर, श्रीनगरकडे यात्रेकरूंना जाण्यास सध्या मज्जाव केला आहे. अमरनाथ यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या सीमकार्डला कुठल्याही प्रकारची रेंज मिळत नसल्याने यात्रेकरू चिंताग्रस्त झाले आहेत. काश्मीर खोऱ्याच्या बातम्यांनी नातेवाईक चिंतेत असताना त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधता येत नसल्याने यात्रेकरू हतबल झाले आहेत. कटराच्या केंद्रात धावसीमकार्ड घेताना राष्ट्रीय रोमिंग नोंदवूनही बीएसएनएलकडून संगणकीय सर्व्हरमध्ये मात्र सीमकार्ड क्रमांकावर राष्ट्रीय रोमिंग सुविधा सुरू केली जात नसल्याने यात्रेकरूंची गैरसोय होत आहे. बहुतांश यात्रक रूंनी कटरा येथील भारत संचार निगमच्या कार्यालयात धाव घेऊन तक्रार केली; मात्र सीमकार्ड महाराष्ट्राचे असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनीही असमर्थता दर्शविली. यात्रेकरूंनी तेथील दूरध्वनीवरून मित्र व नातेवाइकांशी संपर्क साधत स्थानिक केंद्रात रोमिंग सुविधेबाबत तक्रार देण्यास सांगितले.महाराष्ट्र ओलांडल्यानंतर नेटवर्क गेले. जम्मूमध्ये पोहचल्यावरही रेंज मिळत नव्हती. नातेवाइकांशी संपर्क साधता येत नव्हता. पोस्टपेड सीम खास यात्रेसाठी घेतला आहे. अखेर कटरा येथील केंद्रातून नातेवाइकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून शहरातल्या केंद्रात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर राष्ट्रीय रोमिंगची सुविधा सुरू झाली अन् मी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाच दिवसांनंतर वृद्ध आई-वडिलांशी बोलले आणि दिलासा दिला. - अमी पजवानी, यात्रेकरू, नाशिक