शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

युती सरकार जास्त काळ टिकणार नाही : जयंत पाटील

By admin | Updated: January 13, 2015 00:07 IST

भाजप-सेनेत सत्तेसाठी मोठी धुसफूस सुरू दोन, तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल.

मिरज : भाजप-शिवसेनेमध्ये मोठी धुसफूस असल्याने युती सरकार जास्त काळ टिकणारे नाही. दोन-तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केले. मल्लेवाडी (ता. मिरज) येथे आज, सोमवारी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माताई होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जयंत पाटील म्हणाले की, नकारात्मक मतदानामुळे राज्यात ब्राह्मण्यवाद्यांचे सरकार सत्तेवर आले. फडणवीस, जावडेकर, केळकर या मंडळींनी शेती कधीही केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत. भाजप-सेनेत सत्तेसाठी मोठी धुसफूस सुरू असल्याने युती शासन जास्त काळ टिकणारे नाही. दोन, तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल. मिरज तालुक्यात कुंपणावरचे नेते विधानसभा निवडणुकीवेळी पक्षातून बाहेर पडले. राहिलेले सर्व पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्ष आता संपल्याने भाजपशी मुकाबला करायचा आहे. तालुक्यातील सोसायट्या, ग्रामपंचायती यांनी निवडणुकांच्या तयारीला लागावे, दोन वर्षात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी गाव कमिट्या, प्रभाग समित्या, युवक, महिला आाघाड्या तयार करा, शेतकरी शेतमजुरांची कामे करून त्यांचा विश्वास मिळावा. मिरज पूर्व भागातील रस्ते व पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, पंचायत समिती सदस्या सारिका खताळ, बाळासाहेब होनमोरे, अनिता कदम, गंगाधर तोडकर, परशुराम नागरगोजे, आरगचे सरपंच एस. आर. पाटील, परशुराम जाधव, बाळासाहेब माळी, अर्जुन माळी उपस्थित होते. (वार्ताहर)