शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकार जास्त काळ टिकणार नाही : जयंत पाटील

By admin | Updated: January 13, 2015 00:07 IST

भाजप-सेनेत सत्तेसाठी मोठी धुसफूस सुरू दोन, तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल.

मिरज : भाजप-शिवसेनेमध्ये मोठी धुसफूस असल्याने युती सरकार जास्त काळ टिकणारे नाही. दोन-तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केले. मल्लेवाडी (ता. मिरज) येथे आज, सोमवारी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माताई होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जयंत पाटील म्हणाले की, नकारात्मक मतदानामुळे राज्यात ब्राह्मण्यवाद्यांचे सरकार सत्तेवर आले. फडणवीस, जावडेकर, केळकर या मंडळींनी शेती कधीही केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत. भाजप-सेनेत सत्तेसाठी मोठी धुसफूस सुरू असल्याने युती शासन जास्त काळ टिकणारे नाही. दोन, तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल. मिरज तालुक्यात कुंपणावरचे नेते विधानसभा निवडणुकीवेळी पक्षातून बाहेर पडले. राहिलेले सर्व पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्ष आता संपल्याने भाजपशी मुकाबला करायचा आहे. तालुक्यातील सोसायट्या, ग्रामपंचायती यांनी निवडणुकांच्या तयारीला लागावे, दोन वर्षात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी गाव कमिट्या, प्रभाग समित्या, युवक, महिला आाघाड्या तयार करा, शेतकरी शेतमजुरांची कामे करून त्यांचा विश्वास मिळावा. मिरज पूर्व भागातील रस्ते व पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, पंचायत समिती सदस्या सारिका खताळ, बाळासाहेब होनमोरे, अनिता कदम, गंगाधर तोडकर, परशुराम नागरगोजे, आरगचे सरपंच एस. आर. पाटील, परशुराम जाधव, बाळासाहेब माळी, अर्जुन माळी उपस्थित होते. (वार्ताहर)