शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

युती सरकार जास्त काळ टिकणार नाही : जयंत पाटील

By admin | Updated: January 13, 2015 00:07 IST

भाजप-सेनेत सत्तेसाठी मोठी धुसफूस सुरू दोन, तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल.

मिरज : भाजप-शिवसेनेमध्ये मोठी धुसफूस असल्याने युती सरकार जास्त काळ टिकणारे नाही. दोन-तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केले. मल्लेवाडी (ता. मिरज) येथे आज, सोमवारी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माताई होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जयंत पाटील म्हणाले की, नकारात्मक मतदानामुळे राज्यात ब्राह्मण्यवाद्यांचे सरकार सत्तेवर आले. फडणवीस, जावडेकर, केळकर या मंडळींनी शेती कधीही केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहीत नाहीत. भाजप-सेनेत सत्तेसाठी मोठी धुसफूस सुरू असल्याने युती शासन जास्त काळ टिकणारे नाही. दोन, तीन वर्षात पुन्हा बहुजनांचे सरकार येईल. मिरज तालुक्यात कुंपणावरचे नेते विधानसभा निवडणुकीवेळी पक्षातून बाहेर पडले. राहिलेले सर्व पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्ष आता संपल्याने भाजपशी मुकाबला करायचा आहे. तालुक्यातील सोसायट्या, ग्रामपंचायती यांनी निवडणुकांच्या तयारीला लागावे, दोन वर्षात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी गाव कमिट्या, प्रभाग समित्या, युवक, महिला आाघाड्या तयार करा, शेतकरी शेतमजुरांची कामे करून त्यांचा विश्वास मिळावा. मिरज पूर्व भागातील रस्ते व पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, पंचायत समिती सदस्या सारिका खताळ, बाळासाहेब होनमोरे, अनिता कदम, गंगाधर तोडकर, परशुराम नागरगोजे, आरगचे सरपंच एस. आर. पाटील, परशुराम जाधव, बाळासाहेब माळी, अर्जुन माळी उपस्थित होते. (वार्ताहर)