शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकांत युतीचा फार्स

By admin | Updated: October 28, 2016 05:17 IST

राज्यातील २१२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीची घोषणा झाली असली तरी, हा निव्वळ फार्स असूृन दोन्ही पक्षांनी ‘एबी’ वाटप केल्यानंतर नेत्यांना उशिरा जाग आली आहे.

- यदु जोशी, मुंबई

राज्यातील २१२ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीची घोषणा झाली असली तरी, हा निव्वळ फार्स असूृन दोन्ही पक्षांनी ‘एबी’ वाटप केल्यानंतर नेत्यांना उशिरा जाग आली आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, शिवसेनेचे खा. संजय राऊत आणि खा. विनायक राऊत यांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. मात्र, युतीमध्ये कोणता पक्ष कोणकोणत्या नगराध्यक्षपदांसाठी लढणार, कोणत्या नगरपालिकांमध्ये किती जागा वाटून घेतल्या आहेत, याची कोणतीही माहिती दिली गेली नाही.आधी मात्र केली स्वबळाची भाषामुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पक्षाच्या विभागीय मेळाव्यात स्वबळाची भाषा करत या निवडणुकीत युती-आघाडीची भानगड राहणार नाही, असे कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले होते. असे असताना केवळ शिवसेनेच्या समाधानासाठी दोन दिवस आधी भाजपाने युतीचे नाटक केल्याचे म्हटले जात आहे.नाटक टाळायला हवे होते शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाला गळ घालून कोणत्याही परिस्थितीत पालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा करा, असा आग्रह धरला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते गोंधळातराज्यपातळीवर युती झाल्याचे जाहीर करताना युतीबाबतचा निर्णय मात्र स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे नेते घेतील आणि ते तिढा सोडवू शकले नाहीत तर दोन्ही पक्षांचे प्रदेश पातळीवरील नेतृत्व त्याबाबत निर्णय घेईल, असे सांगून दानवे आणि राऊत यांनी कार्यकर्त्यांना आणखी गोंधळात टाकले आहे. युतीच्या घोषणेला एवढा उशीर का, असे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केल्यानंतर युतीचा निर्णय झाला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपावाले किमान दीडशे जागा मागतील. त्यामुळे युती होण्याची शक्यता नाही. असे असताना स्थानिक कार्यकर्त्यांना उभे करायचे तर नगरपालिका निवडणुकीत युतीचे नाटक टाळायला हवे होते, असा शिवसेनेत सूर आहे.147नगरपालिकांचे नगराध्यक्ष व नगरसेवक, तसेच १८ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ आॅक्टोबर आहे.