सदानंद नाईक,
उल्हासनगर- शहाड येथील कोणार्क गृहनिर्माण प्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला देण्याकरिता माझे वडील व उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार संजीव करपे यांच्यावर संबंधित बांधकाम कंपनी व आमदार ज्योती कलानी यांनी मानसिक दबाव टाकला होता, असा खळबळजनक दावा करपे यांची कन्या दीप्ती हिने केला आहे.शहर विकास आराखड्याच्या बैठकीकरिता शनिवारी पुण्याला निघालेले करपे तेथे पोहोचले नाही. त्यांचा मोबाइल लागला नाही. त्यामुळे करपे कुटुंबीयांनी खोपोली पोलीस ठाण्यात संजीव बेपत्ता असल्याची तक्रार केली. शनिवारी रात्रीपासून पोलिसांनी हा परिसर पिंजून काढला. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. दीप्ती यांच्या मते पप्पा काही दिवसांपासून प्रचंड मानसिक दबावाखाली होते. त्यामुळे त्यांनी जर जीवाचे काही बरेवाईट करून घेतले असेल, तर त्याला सर्वस्वी दबाव टाकणारी मंडळी जबाबदार असतील.कलानी यांनीच केली होती तक्रारनगररचनाकार करपे यांनी हरित क्षेत्रासह वाढीव मजल्यांच्या बांधकामाला परवानगी दिल्याचे पत्र आमदार ज्योती कलानी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. या प्रकारात कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाली असल्याने चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे करपे मानसिक दबावाखाली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. आयुक्त हिरे यांनी घेतली करपे कुटुंबाची भेटआयुक्त मनोहर हिरे यांनी करपे यांच्या अंधेरी येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. करपे यांचा कसून शोध घेतला जाईल व प्रशासन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे हिरे यांनी आश्वस्त केले.शिबिरांत दिली बांधकाम परवानगीकरपे यांची नियुक्तीनंतर बांधकाम परवाने देताना सावध भूमिका घेत होते. आयुक्त मनोहर हिरे यांनी सहा महिन्यांत दोन विशेष शिबिरे भरवून बांधकाम परवाने देण्याचे काम केले. या शिबिरामुळे पालिकेला ७ ते ८ कोटींचे उत्पन्न मिळाले होते.>मोबाइलमधील सर्व नंबर केले डिलीट पुण्यातील बैठकीकरिता अंधेरीतून निघालेल्या करपे यांनी स्वत:ची मोटार सोडून दिली. त्यानंतर, त्यांचा ठावठिकाणा नाही. खोपोली पोलीस ठाण्यात करपे हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने नोंदवल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अशोक ठाकूर यांनी बोरघाट परिसर पोलीस पथकाच्या साहाय्याने पिंजून काढला. सोमवारी करपे यांच्या एअरटेल मोबाइलचे लोकेशन तपासण्यात येणार आहेत. त्यांच्या गाडीत बॅग, ४ हजार रुपये रोख तसेच बंद अवस्थेतील मोबाइल मिळाला आहे. मोबाइलमधील सर्व नंबर डिलीट केले आहेत. कन्या दीप्ती, दूधवाला व गाडीचालक असे केवळ चारच नंबर त्यांनी डिलीट केले नाहीत, असे दीप्तीने सांगितले.