शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पुनर्विकासांत ५१ टक्क्यांची अट लागू करा, स्थावर मालमत्ता नियमन प्राधिकरणाकडे अधिकची जबाबदारी सोपवणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:37 IST

सरकारने सर्वच प्रकारच्या पुनर्विकास प्रक्रियेत हा ५१ टक्के सभासदांच्या परवानगीचा निर्णय लागू केल्यास रहिवाशांमधील गोंधळ दूर होईल; आणि २०२२पर्यंत सर्वांसाठी घरकूल हे स्वप्न सत्यात उतरू शकेल, असा आशावाद ज्येष्ठ वास्तुविशारद रमेश प्रभू यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

मुंबई : सरकारने सर्वच प्रकारच्या पुनर्विकास प्रक्रियेत हा ५१ टक्के सभासदांच्या परवानगीचा निर्णय लागू केल्यास रहिवाशांमधील गोंधळ दूर होईल; आणि २०२२पर्यंत सर्वांसाठी घरकूल हे स्वप्न सत्यात उतरू शकेल, असा आशावाद ज्येष्ठ वास्तुविशारद रमेश प्रभू यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. छोट्या इमारती आणि गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास आता केवळ ५१ टक्के रहिवाशांच्या संमतीने होऊ शकतो, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते. या पार्श्वभूमीवर रमेश प्रभू बोलत होते.इमारती किंवा गृहनिर्माण संकुलांमध्ये एकूण रहिवासी संख्या कितीही असली तरी त्यातल्या ५१ टक्के सभासदांच्या परवानगीने काम झाले तर पुनर्विकास प्रक्रिया खूपच सोपी होईल. पुनर्विकास प्रक्रियेतले मतभेद किंवा सभासद मंजुरीसारख्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी एका स्वतंत्र प्राधिकरणाची गरज आहे. किंवा स्थावर मालमत्ता नियमन प्राधिकरणाकडे अधिकची जबाबदारी सोपवणे आवश्यक आहे.महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह सोसायटी अ‍ॅक्ट १९६०च्या कलम ७९ अ नुसार ३ जानेवारी २००९ ला जारी केलेल्या सूचनेत पुनर्विकासाची प्रक्रिया आणि कार्यपद्धतीविषयी माहिती आहे. मात्र त्यात पुनर्विकासात येणाºया मतभेदांवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ती तरतूद नाही. लोकांना हे मतभेद सोडवण्यासाठी एकतर दिवाणी न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागते. या सर्व प्रक्रियेत वेळ खूप जातो.मुंबईतल्या इमारतींचा पुनर्विकास हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. कारण मुंबईचा ५० टक्के भाग हा झोपडपट्टींनी वेढलेला आहे. दक्षिण मुंबईत सेस अंतर्गत सुमारे १९ हजार जुन्या इमारती आहेत. उपनगरातल्या १९९१ पूर्वी बांधलेल्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. नवी मुंबईत सिडकोने दिलेल्या घरांची नोंदणी महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अ‍ॅक्ट १९७० अंतर्गत झाली आहे. पुनर्विकास प्रक्रियेत वेगवेगळ्या प्रकारच्या पुनर्विकासासाठी बहुमताची टक्केवारी ही वेगवेगळी असते, असेही रमेश प्रभू यांनी सांगितले.सेस अंतर्गत येणाºया जुन्या भाडेकरूंच्या इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेत विशिष्ट विकासक नेमण्यासाठी ७० टक्के भाडेकरूंची लेखी परवानगी लागते. काही वेळा अपेक्षित खर्चात या इमारतींचा पुनर्विकास होऊ शकत नाही; कारण ३१ ते ४० टक्के भाडेकरूंचा समूह विकासकाला हाताशी धरून काम थांबवतो.झोपडपट्टी पुनर्विकासातही ७० टक्के झोपडपट्टी रहिवाशांची परवानगी लागत होती; जी आता ५१ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. पूर्वी ७० टक्के झोपडपट्टीधारकांची परवानगी घेणे विकासकाला अवघड होते. मात्र आता ५१ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांच्या पाठिंब्याने पुनर्विकास प्रक्रिया सुरू करणे विकासकाला शक्य झाले आहे.महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह सोसायटी अ‍ॅक्ट १९६० च्या कलम ७९ अ नुसार ३ जानेवारी २००९ ला जारी केलेल्या सूचनेनुसार आता खासगी गृहनिर्माण संकुलांनाही पुनर्विकासासंबंधी निर्देशाचे पालन करावे लागणार आहे. त्यानुसार, पुनर्विकास प्रक्रियेचा ठराव मांडण्यासाठी ७५ टक्के सभासदांनी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणे गरजेचे असून, उपस्थितांपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त सभासदांनी पुनर्विकासाला संमती देणे आवश्यक आहे. एखाद्या विशिष्ट विकासकाची पुनर्विकासासाठी नियुक्ती करायला या सभासदांनी लेखी परवानगी देणे बंधनकारक आहे. ७५ टक्के सभासदांची उपस्थिती मिळवणे हे आव्हान आहे. तसेच उपस्थित सभासदांपैकी ७५ टक्के अधिक सभासदांनी विकासकाची नेमणूक करणे हेही कठीण काम आहे. पुनर्विकासासाठी मतदानाची सरासरी टक्केवारी ही एकूण सभासदांच्या ५६.२५ टक्के असते यात शंका नाही.महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट १९७० अंतर्गत नोंदणी झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासात अपार्टमेंटमधल्या १०० टक्के रहिवाशांची परवानगी लागते. कारण प्रत्येक फ्लॅटधारक हा विभागणी होऊ शकत नसलेल्या जमिनीचाही मालक असतो. जो पुढे दावा करू शकतो; त्यामुळे ही गोष्ट प्रत्यक्षात येऊ शकत नाही आणि पुनर्विकासाला खीळ बसते.स्थावर मालमत्ता नियमन आणि विकास कायदा २०१६ नुसार विकास आराखड्यात सुधारणा करण्यासाठी भागधारकांपैकी दोन तृतीयांश सभासदांची परवानगी लागते.