शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘स्मार्ट’ सिटी संदर्भात सर्वपक्षीय बैठक

By admin | Updated: December 17, 2015 02:48 IST

केंद्र सरकारने देशातील १०० शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी संदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेल्या वेगवेगळ्या सूचनांचा स्वीकार करण्यात येईल.

नागपूर : केंद्र सरकारने देशातील १०० शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी संदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेल्या वेगवेगळ्या सूचनांचा स्वीकार करण्यात येईल. तसेच या संदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांची लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. स्मार्ट सिटी संदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. महापालिकेबाहेरील लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घ्यायला हवे. स्पेशल परपज व्हेईकल (एसपीव्ही) ची स्थापना केली जाणार आहे. एसपीव्हीला कर्ज उभारावयाचे झाल्यास यासाठी महापालिकेची मान्यता घ्यावी लागेल. पुणे महापालिकेचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या राज्यातील दहा शहरात पुणे शहराचा समावेश राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. स्मार्ट सिटी योजना ही वरच्या वर्गाला लाभ मिळण्यासाठी नसून शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा पुरविण्याचा या योजनेचा हेतू आहे. कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर, सुरक्षित सिटी, झोपडपट्टीधारकांना चांगल्या सोयी उपलब्ध करणे. गुंतवणुकीत वाढ, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे स्मार्ट सिटी प्रस्तावाला मंजुरी देताना महापालिकेने काही अटी घालून दिल्याबाबतचा प्रश्न अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेलाच धोरण निश्चित करावयाचे असल्याचे स्पष्ट केले. शरद रणपिसे व अनिल सोले यांनी एसपीव्हीच्या अध्यक्षपदी महापौर असावा अशी सूचना केली. एसपीव्ही जेएनएनयूआरएम योजनेतही होते. यातूनच २४ बाय ७ योजना राबविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रश्नावरील चर्चेदरम्यान संजय दत्त, नीलम गोऱ्हे आदींची प्रश्न उपस्थित केले. (प्रतिनिधी)