शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सर्व पक्षांना ‘व्यापारी’च जवळचे

By admin | Updated: February 17, 2017 22:20 IST

निवडणुकीच्या रिंगणातील ५५ टक्के उमेदवार हे व्यापारीच आहेत.

 

सर्व पक्षांना ‘व्यापारी’च जवळचे
 
सर्वाधिक उमेदवार व्यावसायिक : नोकरदारांकडे पाठ : २७ टक्के उमेदवार गृहिणी
 
 
योगेश पांडे
नागपूर : राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध असतो असे म्हणतात. अनेक व्यावसायिकांचे राजकारण्यांशी जवळचे संबंध असतात. मात्र आता व्यापाºयांनाच राजकारणी बनण्याचे वेध लागले आहे. नागपूर मनपा निवडणुकात याचे प्रत्यंतर येत आहे. निवडणुकीच्या रिंगणातील ५५ टक्के उमेदवार हे व्यापारीच आहेत. उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी नोकरदार कार्यकर्त्यांकडे पाठ फिरविल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या व्यवसायाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. नागपूर शहरात एकूण ११३५ उमेदवार निवडणूक लढत आहेत. यापैकी ६२४ उमेदवारांनी आपली उपजीविका व्यापारावर चालत असल्याचे स्पष्ट केले आहे. ही टक्केवारी ५५ टक्के इतकी आहे, म्हणजेच प्रत्येकी दोघांत एक उमेदवार व्यापारी आहे. केवळ ४२ टक्के उमेदवारांनी शेती हे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून दाखविले आहे, तर ८५ उमेदवार हे काहीच करीत नसल्याचे शपथपत्रात नमूद आहे. विशेष म्हणजे, काहीच करीत नसले तरी यातील अनेक उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न व संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे. 
केवळ ७७ उमेदवार नोकरदार
नोकरदार वर्गाला राजकारणापासून दूर राहणारा पांढरपेशा वर्ग असे म्हटले जाते. या निवडणुकांसाठी अनेक नोकरदार कार्यकर्त्यांनी विविध पक्षांकडे तिकिटांसाठी मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात बहुतांश जणांच्या पदरी निराशाच पडली. केवळ ७७ उमेदवार हे नोकरी करणारे आहेत.
उमेदवारांचे पक्षनिहाय प्रमुख व्यवसाय
पक्षव्यापारीनोकरीकृषी
भाजपा७८
काँग्रेस७६
राष्ट्रवादी        ४६
शिवसेना        ४४११
बहुजन समाज पक्ष       ५४
 
 
‘होम मिनिस्टर’ला प्राधान्य
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महिलांसाठी असलेले आरक्षण लक्षात घेता सर्व लहानमोठ्या पक्षांनी घरातील ‘होम मिनिस्टर’ला प्राधान्य दिले आहेत. एकूण महिलांपैकी ३०७ उमेदवार या गृहिणी आहेत. यात आजी-माजी नगरसेविकांचादेखील समावेश आहे. सर्वाधिक ५४ गृहिणी भाजपात आहेत, तर कॉंग्रेसमध्ये हीच संख्या ४७ इतकी आहे. राष्ट्रवादीने २६, शिवसेनेने १७ तर बसपाने ३० गृहिणींना निवडणुकांच्या सामन्यात उतरविले आहे.
 
कॉंग्रेस-भाजपात सर्वाधिक उमेदवार ‘व्यापारी’
व्यापारी उमेदवार देण्याच्या बाबतीत कॉंग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी आघाडी घेतली आहे. भाजपाने ७८ तर कॉंग्रेसने ७६ ‘व्यापारी’ कार्यकर्त्यांना उमेदवार केले आहे. यात अनुक्रमे २० व २१ महिला उमेदवारांचादेखील समावेश आहे. सर्वाधिक ११ नोकरदार उमेदवार शिवसेनेने दिले आहेत तर ६ शेतकरी उमेदवार भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत.