शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

अरविंद केजरीवालांकडून असलेल्या सर्व अपेक्षा संपल्या - अण्णा हजारे

By admin | Updated: September 6, 2016 13:53 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकवेळचे आपले सहकारी असणारे अरविंद केजरीवाल यांच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा संपल्या असल्याची खंत बोलून दाखवली आहे

- ऑनलाइन लोकमत
राळेगण सिद्धी, दि. 6 - आम आदमी पक्षात सध्या सुरु असलेल्या राजकीय वातावरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. सोबतच एकवेळचे आपले सहकारी असणारे अरविंद केजरीवाल यांच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा संपल्या असल्याची खंतही बोलून दाखवली आहे. अरविंद केजरीवाल यांचा सहकारी मंत्री संदीप कुमार सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकला आहे, काही मंत्री जेलमध्ये गेले आहेत, तर काही भ्रष्टाचारात अडकले आहेत हे पाहणं वेदनादायी असल्याचंही अण्णा हजारे बोलले आहेत. 
 
'मला खूप दुख: झालं आहे. जेव्हा केजरीवाल माझ्यासोबत होते तेव्हा त्यांनी ग्रामस्वराज्यवर पुस्तक लिहिलं होतं. याला ते स्वराज्य म्हणतात का ? यामुळे मी दुखी आहे. त्यांच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा आता संपल्या आहेत', असं अण्णा हजारे बोलले आहेत. 
आप नेता संदीप कुमार सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकल्याच्या पार्श्वभुमीवर बोलताना अण्णा हजारे यांनी ही टीका केली. अण्णा हजारे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन छेडल्यानंतर अरविंद केजरीवाल प्रकाशझोतात आले होते.
 
मनमोहन सिंह सरकारच्या काळात झालेल्या या आंदोलनाचा चेहरा जरी अण्णा असले तरी यात प्रमुख भूमिका केजरीवालांची होती. मात्र आंदोलनानंतर दोघेही वेगळे झाले होते. राजकारणात प्रवेशाच्या मुद्द्यावरुन अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल वेगळे झाले होते. 
 
अरविंद केजरीवाल यांनी यानंतर आम आदमी पक्षाची स्थापना करुन दिल्लीत सत्ता मिळवली. मात्र अण्णांनी केजरीवालांना पाठिंबा देण्यास नकार देत फारकत घेतली.