शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

भाजपात गेलेले कंटाळून परतले : अजित पवार

By admin | Updated: January 25, 2017 22:30 IST

आमच्यातून जे गेले ते गेले, त्यांचा विचार करीत नाही; मात्र जे गेले त्यांच्यातील अनेकांचा तिथला अनुभव चांगला नाही. त्यातील काही परतही येऊ लागले आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी टीका केली.

 

पुणे : आमच्यातून जे गेले ते गेले, त्यांचा विचार करीत नाही; मात्र जे गेले त्यांच्यातील अनेकांचा तिथला अनुभव चांगला नाही. त्यातील काही परतही येऊ लागले आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीवर थेट नाव न घेता टीका केली. समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सूचना आहे, त्याप्रमाणे काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची बोलणी सुरू आहेत, असे ते म्हणाले.
जंगली महाराज रस्त्यावर पक्षाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद््घाटन पवार यांच्या हस्ते झाले. काँग्रेसचे नगरसेवक, माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना काकडे, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, पक्षप्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, तसेच अन्य पदाधिकारी, नगरसेवक, इच्छुक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
भाजपात गेलेल्या विनायक तांबे यांना या वेळी पक्षात प्रवेश देण्यात आला. त्याचा उल्लेख करून पवार म्हणाले, ‘‘तिथे गेलेले आता भेटून सांगतात की राष्ट्रवादीमध्ये एका कुटुंबासारखे वाटत होते. तिथे आम्हाला वेगळे वागवतात. परत पक्षात यायचे आहे. जाणारे आमच्याकडे आले तेव्हा कोणीही नव्हते. पक्षाने त्यांना पद दिले, प्रतिष्ठा दिली. आता त्यांना नको वाटत असेल तर आग्रह नाही.’’ 
पवार म्हणाले, ‘‘आघाडीसाठी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू आहेत. जागा निश्चित होत आहेत. आता बुधवारी दोन्ही शहराध्यक्षांमध्ये चर्चा होईल व अंतिम निर्र्णय घेतला जाईल. समविचारी पक्ष बरोबर असावेत असा आमचा प्रयत्न आहे. याचा अर्थ भाजपाला घाबरून आघाडी करीत आहोत असा नाही. यापूर्वी काँग्रेसशी आघाडी केली नाही याचे कारण आम्ही पुण्यातील तत्कालीन काँग्रेस नेत्यांच्या विरोधातच होतो. आता तसे नाही. सध्याच्या त्यांच्या नेतृत्वाशी मतभेद नाहीत. त्यामुळेच चर्चेत आमची भूमिका सकारात्मक आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यातही आघाडीसंदर्भात चर्चा झाली आहे. स्थानिक नेत्यांचे म्हणणे लक्षात घेऊन यासंबंधीचे निर्णय घेण्यास दोघांचाही संमती आहे.’’
मोहिनी देवकर यांना उमेदवारी देणार याची खात्री हवी होती, ती देता येत नव्हती, त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले, असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)